कल्याण स्थानक परिसरातील कामामुळे आगाराचे स्थलांतर, सहा महिन्यांपासून एसटी प्रवाशांचे हाल सुरू| Maharashtra Times
म. टा. वृत्तसेवा, कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरात ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने आधीच स्टेशन परिसराला वाहतूककोंडीचे ग्रहण लागले आहे. त्यातच येथील मुख्य एसटी आगार तात्पुरत्या स्वरूपात विठ्ठलवाडी आगारात स्थलांतरित करण्यात आले आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या एसटी बसगाड्या कल्याण पूर्वेकडून थेट विठ्ठलवाडीला जात असल्याने, कल्याण पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे….
