शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार?:अंमलबजावणी अंतिम टप्प्यात, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात पैसे येणार
अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या राज्यातील बळिराजाला मुख्य प्रवाहा आणण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ऐतिहासिक कर्जमाफी योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र शेतकरी बांधवांना थेट आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट रक्कम जमा…
