Headlines

Vasai Four Year Old Girl Struck by Water Tanker Tempo Girl Dies; मैत्रिणींसोबत खेळताना काळाची झडप, भरधाव टेम्पोची चिमुकलीला जोरदार धडक; घरासमोरच निक्षाचा करुण अंत


Palghar Accident News : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्यानंतर आता खेरपाडा-दुर्गानगर परिसरात देखील अपघात झाला आहे. या अपघातात ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

Vasai accident four year old girl dies
वसई अपघात चार वर्षीय मुलीचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमूलकुमार जैन, पालघर : वसई पूर्वेकडील खेरपाडा-दुर्गानगर परिसरात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला असून, घरासमोर खेळणाऱ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीचा टेम्पोखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका क्षणात आयुष्य संपवणाऱ्या या घटनेमुळे हळहळ आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.

नेमकी घटना काय?

काल शनिवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास डी. के. स्कूलजवळ ही घटना घडली. निक्षा शर्मा (वय ४ वर्ष) ही चिमुरडी आपल्या घरासमोर मित्रांसोबत खेळत होती. त्याचवेळी पाणी वाहून नेणारा एक भरधाव पिकअप टेम्पो त्या मार्गावरून येत होता. खेळण्यात मग्न असलेल्या या चिमुरडीला टेम्पो चालकाने पाहिलं नाही आणि ती अचानक वाहनाच्या चाकाखाली आली. अपघात इतका भीषण होता की तिचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना भरवस्तीत घडल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ‘खेळण्याचे वय आणि मृत्यूची वेळ’, अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी वाहनचालकांच्या निष्काळजीपणावर तीव्र टीका केली आहे. भरधाव वाहनांचा वाढता वेग आणि रस्त्यावरील बेफिकीरपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
Maharashtra TimesYavatmal Crime: सात वर्षीय बेपत्ता मुलीची शेजाऱ्याच्या घरात आढळली बॉडी; पोलिसांनी दोन भावांना केली अटक

परिसरात हळहळ

घटनेची माहिती मिळताच वाळीव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण वसई परिसर शोकमग्न झाला असून, निष्पाप जीव गमावल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी आणि वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

त्रिकोणी कुटुंबाचा क्षणार्धात करुण अंत

दरम्यान, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ढेकाळे येथील वाघोबा खिंड परिसरात एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मोटरसायकलवरील तिघांचा मृत्यू झाला आहे. भरत शंकर माघी, वंदना भरत माघी आणि सुर्या भरत माघी अशी मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे असून हे सर्व विक्रमगड येथील राहणार आहेत.
Maharashtra Timesमृत्यूशी झुंज संपली! 16 दिवसांनंतर Hit And Run केसमधील जखमी हरमनचाही अंत, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील कार्यवाही सुरू आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू असून मनोर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मनोर ग्रामीण रुग्णालयात हलवले आहेत. दरम्यान, अपघात करून फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून पुढील तपास सुरू आहे. अतिशय भयंकर हा अपघात घडला असून शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा