Headlines

jasprit bumrah not travelling with team india initially for sri lanka tests ; फिटनेस टेस्ट पास करणारा बुमराह श्रीलंका कसोटी खेळणार की नाही? बीसीसीआयनं ठेवला सस्पेन्स, काय घडतंय?


श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी जसप्रीत बुमराहबाबत मोठी माहिती समोर आली आहे. फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केल्यानंतरही टीम इंडिया त्याच्याबाबत घाई करण्याच्या मनःस्थितीत नाही.

jasprit bumrah not travelling with team india
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होत आहे. काल भारताच्या चाहत्यांसाठी मोठी अपडेट समोर आली होती. पण जसप्रीत बुमराहने त्याची फिटनेस टेस्ट पास केली असली, तरी टीम मॅनेजमेंट त्याच्या बाबतीत कोणतीही घाई करू इच्छित नाही. बुमराहने पूर्णपणे लयीत यावे, यासाठी त्याला पुरेसा वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतीय संघासोबत प्रवास करणार नाही?

भारतीय संघ ३ आणि ४ ऑगस्ट रोजी मुंबईहून श्रीलंकेसाठी रवाना होणार आहे. मात्र, जसप्रीत बुमराह या प्रवासात सुरुवातीला संघासोबत असणार नाही. पहिला कसोटी सामना १५ ऑगस्ट रोजी गॉल येथे खेळवला जाणार आहे. बुमराहचा संघात समावेश करण्यात आला आहे, तरीही त्याला विश्रांती देऊन मगच संघासोबत जोडले जाणार आहे.

Maharashtra TimesCommonwealth games 2026 : बॉक्सिंगमध्ये भारतीय लेकींचा दमदार पराक्रम, प्रीती-जास्मिननं 5-0 ने जिंकले दोन्ही सामने; दहा मिनिटांत 2 गोल्ड खिशात

आजपासून सुरू करणार गोलंदाजीचा सराव

इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स एकदिवसीय सामन्यादरम्यान बुमराहला दुखापत झाली होती. त्यानंतर वैद्यकीय टीमच्या सल्ल्यानुसार त्याने ८ ते १० दिवस पूर्ण विश्रांती घेतली. विश्रांतीचा हा काळ संपल्यानंतर तो बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सीलन्समध्ये दाखल झाला. शनिवार म्हणजेच आजपासून तो नेटमध्ये गोलंदाजीचा सराव सुरू करणार आहे. तसेच हळूहळू तो आपल्या गोलंदाजीची तीव्रता वाढवणार आहे.

गॉल कसोटीपूर्वी संघात सामील होण्याची शक्यता

भारतीय संघ ७ ऑगस्टपासून कोलंबोमध्ये चार दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. बुमराह बंगळुरूमध्ये आपल्या गोलंदाजीचा सराव करेल. सर्व वैद्यकीय प्रोटोकॉल पूर्ण केल्यानंतर आणि फिटनेसची खात्री पटल्यानंतरच तो पहिल्या कसोटी सामन्याच्या आधी गॉलमध्ये भारतीय संघात सामील होईल.

Maharashtra TimesAsmita dey : सायकल मेकॅनिकच्या मुलीनं भारताला ज्युडोमध्ये दिलं पहिलं गोल्ड! कोण आहे अस्मिता डे? जिद्दी खेळाडूचा प्रवास वाचा

WTC फायनलच्या दृष्टीने मालिका अत्यंत महत्त्वाची

जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) मालिकेच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय संघात अनेक दुखापतींच्या समस्या असताना बुमराह पूर्णपणे फिट होऊन संघात परतणे आवश्यक आहे. त्यामुळेच टीम मॅनेजमेंट त्याच्याबाबतीत कोणतीही घाई किंवा रिस्क घेण्यास तयार नाही.