राज्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी:मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात मुसळधार; हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'
गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून विशेषतः कोकण किनारपट्टी आणि लगतच्या भागांत पावसाचा जोर वाढला असून, अनेक ठिकाणी हलक्या ते मुसळधार सरी कोसळत आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला…
