Monsoon Update | राज्यातील २३ जिल्ह्यांना ‘यलो’ तर ५ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’; कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातून गायब झालेल्या मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले असून अनेक भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत मान्सून आणखी सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला असून विशेषतः कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह उपनगरांमध्येही सकाळपासून संततधार पाऊस सुरू असून घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड,…
