Rishabh Pant News : भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतला उत्तराखंडमध्ये जमीन खरेदी करून दिल्लीहून आपल्या मायभूमीत शिफ्ट व्हायचे आहे. पंतने केलेल्या विनंतीनंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतला आपल्या मायभूमी उत्तराखंडमध्ये परतायचे आहे. यासाठी तो गेल्या तीन वर्षांपासून आपल्या गरजेनुसार जमीन शोधत आहे. मात्र, अद्याप योग्य प्रॉपर्टी मिळालेली नाही. आता पंतने थेट उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे मदत मागितली आहे. पंतच्या पोस्टची दखल घेत मुख्यमंत्र्यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश दिले आहेत.
पंतच्या पोस्टनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री ऋषभ पंतने एक्सवर पोस्ट करत उत्तराखंडमध्ये जमीन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याला सरकारी दरानुसार जमीन खरेदी करायची असल्याचेही त्याने सांगितले. पंतच्या या पोस्टला मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उत्तर दिले. उत्तराखंडचा गौरव असल्याचे सांगत धामी यांनी पंतच्या मायभूमीवरील प्रेमाचे कौतुक केले. तसेच या विषयासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अधिकारी लवकरच पंतशी संपर्क साधतील आणि नियमानुसार शक्य ती सर्व मदत करतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सध्यातरी ऋषभला कुठे जमीन मिळणार हे स्पष्ट झालेले नाही, पण त्याच्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतला आहे.
ऋषभ पंतचा जन्म उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील रुडकी येथे झाला. क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी त्याने दिल्लीचा रस्ता धरला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो दिल्लीचे प्रतिनिधित्व करतो. मात्र, आता आपल्या मायभूमीत परतण्याची पंतची इच्छा आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो उत्तराखंडमध्ये जमीन शोधत असल्याचे त्याने सांगितले. आपल्या गरजा पूर्ण करणारी प्रॉपर्टी अद्याप मिळाली नसल्याने त्याने मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली.
सध्या टीम इंडियासोबत श्रीलंका दौऱ्यावर
दरम्यान, ऋषभ पंत सध्या भारतीय संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेत पंतकडून टीम इंडियाला मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा