Headlines

RBI Cancels licence of Maharashtra based The Yashwant Co op Bank in Phaltan Satara licence; रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून परवाना रद्द, यशवंत सहकारी बँक सर्व व्यवहार थांबवले, ग्राहकांना ट्रांझॅक्शन करता येणार नाही, सहकार क्षेत्रात खळबळ, ठेवीदारांचं काय?


RBI Cancels licence of The Yashwant Co op Bank : बँकिंग क्षेत्रातील सुरक्षितता आणि स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक महत्त्वाच्या नियामक अटी व शर्तीचे पालन करण्यात यशवंत सहकारी बँकेचे व्यवस्थापन अपयशी ठरली असल्याचा ठपका आरबीआयने ठेवला

Yashwant Co Operative Bank Phaltan Satara RBI Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : ईडीच्या कारवाईनंतर फलटण येथील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेवर आता अखेरची मोठी कारवाई झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यशवंत बँकेचा परवाना रद्द करत मंगळवारी सायंकाळपासून (१९ मे) बँकेचे सर्व व्यवहार थांबवले आहेत. आरबीआयच्या आदेशानुसार ग्राहकांना आता या बँकेत कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. या कारवाईने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून भाजप नेते तथा सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना मोठा झटका बसला आहे.

ग्राहकांच्या ठेवी पूर्णपणे परत करण्यास असमर्थ

यशवंत बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत खालावल्यामुळे ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हे कडक पाऊल उचलणे भाग पडले आहे. बँकेकडे सध्या व्यवसाय चालवण्यासाठी पुरेसे भांडवल आणि भविष्यात कमाईची कोणतीही शाश्वत चिन्हे उरलेली नसल्याचेही आरबीआयने म्हटले आहे. बँकेची सद्यस्थिती पाहता, ही बँक आपल्या ग्राहकांच्या ठेवी पूर्णपणे परत करण्यास असमर्थ असल्याचे आरबीआयने स्पष्टपणे नमूद केले आहे.

बँकेचे कामकाज सुरु ठेवणे घातक

बँकिंग क्षेत्रातील सुरक्षितता आणि स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक महत्त्वाच्या नियामक अटी व शर्तीचे पालन करण्यात बँक व्यवस्थापन अपयशी ठरली असल्याचा ठपका आरबीआयने ठेवला आहे. तसेच बँकेचे कामकाज पुढे सुरू ठेवणे ठेवीदारांच्या आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने पूर्णपणे घातक ठरेल, असा निष्कर्षही काढला आहे.

Chhagan Bhujbal आणि Girish Mahajan यांच्यात मिश्किल टोलेबाजी, नेमकं काय घडलं?

बँक गुंडाळण्याची प्रक्रिया सुरु करा

परवाना रद्द करून यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेला नवीन ठेवी स्वीकारणे किंवा जुन्या ठेवींचे वाटप करणे यासह सर्व प्रकारच्या बँकिंग कामकाजावर पूर्णपणे बंदी घातली आहे. बँक गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आणि त्यावर तातडीने ‘लिक्विडेटर’ नियुक्त करण्याचे निर्देशही आरबीआयने महाराष्ट्राचे सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांच्या निबंधकांना दिले आहेत. हा लिक्विडेटर बँकेच्या सर्व मालमत्तेचा ताबा घेईल आणि कर्जवसुली करून मिळालेल्या पैशांतून देणी चुकती करेल.
Maharashtra TimesCrime News : विवाहित बॉयफ्रेण्डसाठी सेल्सगर्लची ज्वेलरी शॉपमध्ये चोरी, 1.66 कोटींचे दागिने लंपास, आंघोळ करताना विश्वासघात अन् गेम पालटला

घाबरण्याचे कारण नाही

बँकेचा परवाना रद्द करण्यात आला असला तरी सर्वसामान्य आणि लहान ठेवीदारांना घाबरण्याचे कारण नाही. भारतात सर्व बँक ग्राहकांसाठी उपलब्ध असणाऱ्या ‘डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’ (DICGC) या विमा प्रणाली अंतर्गत प्रत्येक ठेवीदाराचे पैसे सुरक्षित राहणार आहेत. बँकेच्या उपलब्ध आकडेवारीनुसार बँकेतील तब्बल ९९.०२% ठेवीदार हे ५ लाख किंवा त्यापेक्षा कमी ठेव असणारे आहेत. त्यामुळे डीआयसीजीसीच्या नियमांनुसार या सर्व ग्राहकांना त्यांचे संपूर्ण पैसे परत मिळतील. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेला आधीच गती देण्यात आली असून ठेवीदारांच्या संमतीनुसार २० एप्रिल २०२६ पर्यंत ‘डीआयसीजीसी’ने १०६.९६ कोटी रुपयांचे विमा वाटप पूर्ण केले आहे.

Yashwant Co Operative Bank Phaltan Satara RBI  Maharashtra Times (1)

अतिरिक्त रक्कम मिळणं लिक्विडेटरवर अवलंबून

ज्या ग्राहकांची बँकेत ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा आहे, त्यांना नियमानुसार ५ लाख रुपये विमा संरक्षणापोटी निश्चित मिळतील. मात्र, त्यावरील अतिरिक्त रक्कम मिळणे हे लिक्विडेटर बँकेची कर्जे वसूल करून आणि बँकेची मालमत्ता विकून किती निधी गोळा करतो, यावर अवलंबून असेल. भाजपाच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी यशवंत बँकेतील गैरव्यवहाराबद्दल आरबीआयकडे तक्रार केलेली होती. त्या अनुषंगाने बँकेच्या तीन शाखांवर ईडीनं डिसेंबर २०२५ मध्ये छापे टाकून भाजपा नेते आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह भावाला ईडीनं अटक केली आहे.
Maharashtra TimesNEET Paper Leak : ‘गुरु’ कुलकर्णीने 132 प्रश्न सांगितले, मोटेगावकरने लिहून घेतले, मोबाईलमध्ये PDF सेव्ह; पुण्यातील क्लास चालकांवरही संशयाची सुई

112 कोटींचा गैरव्यवहार

यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील 112 कोटी 10 लाख 57 हजार 481 रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी भाजपा नेते, राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष आणि बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह 50 जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीतील लेखापरीक्षण आणि 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2024 दरम्यानच्या लेखापरीक्षण पूर्व कालावधीत जे संचालक कार्यरत होते. त्यांच्यावर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा