सहा दिवसांच्या खंडानंतर अहिल्यानगरमध्ये अर्धा तास कोसळला दमदार पाऊस:नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जतमध्ये सरासरी ओलांडली; राहुरी फक्त 34.7 टक्क्यांवर
. जिल्ह्यात बुधवारी अनेक तालुक्यांत पावसाने पुन्हा हजेरी लावत खरीप पिकांना दिलासा दिला. मात्र, पावसाचे चित्र अजूनही जिल्हाभर एकसारखे नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. शहरात मागील सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी दुपारी सुमारे अर्धा तास दमदार पाऊस झाला. सावेडी, कल्याण रोड, दिल्ली गेट, स्वास्तिक चौक परिसरात जोरदार सरी कोसळल्या. उड्डाणपुलाखाली काही काळ पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून मार्ग…
