ठाण्यात तीन हात नाक्यावरील कोंडी फुटणार, २०० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; दीड वर्षात पूर्ण होणार
म.टा. खास प्रतिनिधी, ठाणे: ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि वाहतूककोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या तीन हात नाका चौकाच्या वाहतूककोंडी मुक्तीसाठी महत्त्वाकांक्षी तीन हात नाका सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. हा प्रकल्प शहरातील सर्वांत मोठ्या आणि अत्याधुनिक वाहतूक सुधारणा प्रकल्पांपैकी एक…
