Headlines

Koyna Water Crisis: कोयनेतील पाणी आटल्याने कोकणात जलसंकट; लोटे एमआयडीसीतील अनेक उद्योग बंद


Koyna Water Crisis: उद्योग बंद राहिल्याने याचा परिणाम हजारो कामगार, कंत्राटी कर्मचारी आणि उद्योगाशी संबंधित व्यवसायांवर होत आहे.

koyna dam
कोकण जलसंकट(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, चिपळूण : जून संपत आला तरीही पावसाचा पत्ता नसल्याने कोकणात पाणीटंचाईचे संकट तीव्र होत आहे. कोयना धरणात पाणी आटल्याने वीजनिर्मिती बंद आहे. याचा परिणाम चिपळूण परिसर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत लोटे एमआयडीसीवर झाला असून, काही कंपन्यांवर प्रकल्प बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

घरडा केमिकल कंपनीला सर्व प्रकल्प बंद ठेवावे लागले आहेत. कोकणातच नव्हे तर कोयना धरण क्षेत्रातही पाऊस न झाल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका आता पिण्याच्या पाण्याबरोबरच आता थेट औद्योगिक क्षेत्रालाही बसतो आहे. खेड लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये पाणीपुरवठा जवळपास बंद झाल्याने झाल्याने अनेक उद्योग अडचणीत आले आहेत. पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याने उत्पादन प्रक्रिया सुरू ठेवणे अशक्य बनले आहे.

Maharashtra TimesRaigad News : सह्याद्रीच्या कुशीत दडलेला इतिहास उजेडात; 600 फूट खोल दरीतून बाहेर आल्या स्वराज्याच्या तोफा
एमआयडीसीतील इतर अनेक मोठ्या आणि मध्यम उद्योगांकडेही पाण्याचा साठा अत्यल्प प्रमाणात शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. पाऊस सुरू झाला नाही, तर उर्वरित कंपन्यांनाही उत्पादन बंद करण्याची वेळ येईल, अशी भीती वर्तविण्यात येत आहे.

पाणीसंकट का गहिरे ?
– कोयना धरणाच्या चार टप्प्यांमधून एकूण १९६० मेगावॉट वीज निर्मिती केली जाते.
– हे चारही टप्पे बंद असून केवळ मूळ टप्पा सुरू असून, त्यामधून सांगलीला पिण्याचे पाणी सोडले जाते.
– सर्वांत खालच्या टप्प्यातून २० मेगावॉट वीजनिर्मिती सुरू असून, वीजपुरवठ्याचे संकट ओढवले आहे.
– कोयना धरणातील पाणीपातळी आटल्याने त्याचा परिणाम चिपळूणमधील वाशिष्ठी नदीवर झाला आहे.
– त्यामुळे प्राधान्य पिण्याच्या पाण्याला द्यावे लागत आहे.

Maharashtra TimesEknath Shinde: ट्रिपल संजय अन् षटकार! ठाकरेंचे 6 फुटीर खासदार शिंदेसेनेत; भाईंकडून आणखी धमाक्यांचे संकेत
लोटे औद्योगिक वसाहतीत रासायनिक, औषधनिर्माण, रंगनिर्मिती आदी उत्पादन क्षेत्रातील शेकडो उद्योग आहेत. पाणी हा मुख्य स्रोतच बंद झाल्यामुळे पाण्याअभावी कंपन्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. – प्रशांत पटवर्धन, अध्यक्ष, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा