24 तासांनी ‘वेगाचा बादशहा’ बैल सुखरूप सापडला; गावात जल्लोष!
उत्तूर -बेंदूर सणाच्या दिवशी करीदरम्यान उधळून बेपत्ता झालेल्या बैलामुळे आर्दाळ गावावर चिंतेचे सावट पसरले होते. शेतकरी संजय विठ्ठल पोटे यांच्या जिवापाड जपलेल्या आणि परिसरात ‘वेगाचा बादशहा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलाचा अखेर मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सुखरूप शोध लागला. तब्बल चोवीस तासांच्या प्रतीक्षेनंतर बैल परतल्याने गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बैल हरवल्यानंतर संजय पोटे, त्यांचे…
