पावसाची दिरंगाई अन् मुख्यमंत्र्यांची घाई !
कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्तार तूर्त लांबला असला तरी या आठवड्याच्या अखेरपर्यंत शपथविधी सोहळा होणार आहे. कारण, एकीकडे पावसाअभावी दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यासाठी विनाविलंब पालकमंत्र्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. मंत्रिमंडळाचा पूर्णपणे विस्तार झाल्यानंतरच कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असणार? हे ठरणार आहे. त्यामुळेच जशी इच्छुकांना घाई आहे, तितकीच घाई मुख्यमंत्र्यांनाही आहे. पावसाअभावी कर्नाटकातील 178 तालुक्यात दुष्काळाची…
