मुंबईसह राज्यातील पावसाच्या दुर्घटनांची उच्चस्तरीय चौकशी करा:दोषींवर कठोर कारवाईची विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची मागणी
राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह अनेक भागांत घडलेल्या दुर्घटनांमध्ये निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचा मुद्दा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी विधानसभेत उपस्थित केला. या सर्व घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी आणि यंत्रणांची जबाबदारी निश्चित करावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी सरकारकडे केली. मुंबईतील दुर्घटनांवर सरकारला धारेवर विधानसभेचे…
