अचलपूर तालुक्यातील वडुरावासीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन:घरकुल योजनेच्या लाभासाठी प्रशासनाकडे तातडीने मागणी
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातल्या पांढरी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या वडुरा गावातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. घरकुल योजनेचा लाभ तातडीने मिळावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनील घटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. निवेदनानुसार, संबंधित कुटुंबे आदिवासी आणि गरीब असून, गेल्या १५ वर्षांपासून झोपड्यांमध्ये राहत आहेत. त्यांच्या झोपड्या…
