रस्त्यांवरील झाडांच्या छाटलेल्या फांद्या बेवारस:महापालिकेच्या दिरंगाईमुळे नागरिक त्रस्त
अमरावती शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर झाडांची छाटणी केल्यानंतर कचरा उचलण्याकडे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, रस्त्याच्या कडेला पडलेल्या डहाळ्या, पाने आणि फांद्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, तसेच अपघाताचा धोकाही वाढला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर किंवा नियमित देखभालीचा भाग म्हणून मनपाच्या वृक्ष प्राधिकरणातर्फे रस्त्यांवरील झाडांच्या धोकादायक फांद्या छाटण्याचे काम हाती…
