Dia Mirza on Narendra Modi video:शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहार आणि नीट पेपर लीक विरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली असून नुकताच त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत पेपर लीक रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात येईल ,असं सांगितलं. यावर दीया मिर्झानं प्रतिक्रिया दिली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: NEET परीक्षा गैरव्यवहार आणि पेपर लीक प्रकरणावरून देशभरात विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उशिरा रात्री (मध्यरात्री) एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत त्यांनी पेपर लीक रोखण्यासाठी कठोर कायदा आणि फास्ट-ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचे आश्वासन दिलं. मात्र, त्यांच्या या व्हिडिओ संदेशात त्यांनी स्पष्ट असं काहीच सांगितलं नाही, किंवा ठोस आश्वासनही दिलं नसल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यावर आता अभिनेत्री दीया मिर्झा हिनं पोस्ट शेअर करत टीका केली आहे.
दीया मिर्झा हिनं अत्यंत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ज्या पालकांनी आपली मुलं गमावली, त्यांच्यासाठी आणि हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान मोदींच्या तोंडातून सहानुभूतीचा एक शब्दही निघाला नाही, अशी थेट टीका तिनं सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे. “बोलण्यासाठी ४७ दिवस लागले, पण तरीही शांतता…” दीया मिर्झानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. पंतप्रधान मोदींना थेट प्रश्न विचारत तिनं लिहिलंय की, आपले मूल गमावलेल्या पालकांसाठी, प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी, हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुण विद्यार्थ्यांच्या धैर्यासाठी, आणि गेल्या कित्येक आठवड्यांपासून उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांसाठी सहानुभूतीचा एक शब्दही नाही? सर, हे करणं इतकं कठीण आहे का? असा सवालही दीया मिर्झानं विचारलाय.
तिनं पुढं असंही लिहिलं की, तुम्हाला या विषयावर बोलण्यासाठी तब्बल ४७ दिवस लागले. आणि आता जेव्हा तुम्ही बोललात, तेव्हा लाखो दुखावलेल्या मनांवर फुंकरही घातली नाही, तुम्ही काहीहच बोलला नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओत काय म्हटलं नेमकं?
गुरुवारी रात्री ११:५२ च्या सुमारास पंतप्रधान मोदी यांनी जारी केलेल्या व्हिडिओत त्यांनी पेपर लीक करणाऱ्यांविरोधात फास्ट-ट्रॅक कोर्टात खटले चालवले जातील आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेला नवा कायदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडला जाईल, असं म्हटलंय. तसंच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये ही सरकारची प्राथमिक जबाबदारी होती, त्यादृष्टीनं लवकर परीक्षा घेतल्या, त्याचा निकालही लागलाय. दोषींवर कठोर कारवाई सुरू असल्याचं सांगत पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केलं.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा