Headlines

बोलायला ४७ दिवस लागले, पण मुलं गमावलेल्या पालकांसाठी सहानुभूतीचा एक शब्दही नाही, PM मोदींच्या व्हिडिओवर दीया मिर्झाची नाराजी


Dia Mirza on Narendra Modi video:शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहार आणि नीट पेपर लीक विरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली असून नुकताच त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत पेपर लीक रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात येईल ,असं सांगितलं. यावर दीया मिर्झानं प्रतिक्रिया दिली आहे.

Dia Mirza
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: NEET परीक्षा गैरव्यवहार आणि पेपर लीक प्रकरणावरून देशभरात विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उशिरा रात्री (मध्यरात्री) एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत त्यांनी पेपर लीक रोखण्यासाठी कठोर कायदा आणि फास्ट-ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचे आश्वासन दिलं. मात्र, त्यांच्या या व्हिडिओ संदेशात त्यांनी स्पष्ट असं काहीच सांगितलं नाही, किंवा ठोस आश्वासनही दिलं नसल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यावर आता अभिनेत्री दीया मिर्झा हिनं पोस्ट शेअर करत टीका केली आहे.

दीया मिर्झा हिनं अत्यंत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ज्या पालकांनी आपली मुलं गमावली, त्यांच्यासाठी आणि हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान मोदींच्या तोंडातून सहानुभूतीचा एक शब्दही निघाला नाही, अशी थेट टीका तिनं सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे.

“बोलण्यासाठी ४७ दिवस लागले, पण तरीही शांतता…”

दीया मिर्झानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. पंतप्रधान मोदींना थेट प्रश्न विचारत तिनं लिहिलंय की, आपले मूल गमावलेल्या पालकांसाठी, प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी, हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुण विद्यार्थ्यांच्या धैर्यासाठी, आणि गेल्या कित्येक आठवड्यांपासून उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांसाठी सहानुभूतीचा एक शब्दही नाही? सर, हे करणं इतकं कठीण आहे का? असा सवालही दीया मिर्झानं विचारलाय.

तिनं पुढं असंही लिहिलं की, तुम्हाला या विषयावर बोलण्यासाठी तब्बल ४७ दिवस लागले. आणि आता जेव्हा तुम्ही बोललात, तेव्हा लाखो दुखावलेल्या मनांवर फुंकरही घातली नाही, तुम्ही काहीहच बोलला नाहीत.

Maharashtra TimesAtul Kulkarni post: आजच्या परिस्थितीला आम्ही कारणीभूत आहोत, जेन झींना फुल्ल पाठिंबा देत अभिनेते अतुल कुलकर्णींची आणखी एक जळजळीत पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओत काय म्हटलं नेमकं?

गुरुवारी रात्री ११:५२ च्या सुमारास पंतप्रधान मोदी यांनी जारी केलेल्या व्हिडिओत त्यांनी पेपर लीक करणाऱ्यांविरोधात फास्ट-ट्रॅक कोर्टात खटले चालवले जातील आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेला नवा कायदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडला जाईल, असं म्हटलंय. तसंच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये ही सरकारची प्राथमिक जबाबदारी होती, त्यादृष्टीनं लवकर परीक्षा घेतल्या, त्याचा निकालही लागलाय. दोषींवर कठोर कारवाई सुरू असल्याचं सांगत पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केलं.

Maharashtra TimesRenuka Shahane :आमचं २५ वर्षांचं सुंदर नातं, पण आशुतोष यांना दिग्दर्शित करताना एक पत्नी म्हणून थोडी भीती होती, असं का म्हणाल्या रेणुका शहाणे?
दिल्लीच्या जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचं तीव्र आंदोलन
NEETपरीक्षेतील कथित गैरव्यवहार, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि परीक्षा पद्धतीत पारदर्शकतेची मागणी घेऊन दिल्लीतील जंतर-मंतर इथं गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांचं जोरदार आंदोलन सुरू आहे. पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनीही विद्यार्थ्यांच्या समर्थनात उपोषण केलं होतं.