Headlines

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम जिला आई मानायचा, जेनाबाई दारुवाली कोण होती?


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा एकेकाळी एका महिलेच्या सर्व गोष्टी ऐकायचा. तो एकवेळ आपल्या आई-वडिलांचं ऐकणार नाही, पण या महिलेच्या गोष्टी ऐकायचा. त्यामागे कारणही तसंच होतं. दाऊद या महिलेला आई मानायचा. ही महिला होती, मुंबईतली दारु माफिया. तिचं नाव होतं जेनाबाई दारुवाली! याच जेनाबाईची विस्तृत माहिती आपण जाणून घेऊयात.

Jenabai Daruwali
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबईचा फार मोठा इतिहास राहिला आहे. मुंबई राजकारण, व्यापार, संस्कृतीसाठी जितकी प्रसिद्ध आहे, तितकाच मुंबईतला गुन्हेगारीचा एक रक्तरंजित असा इतिहास राहिलेला आहे. मुंबईने एकेकाळी खूप सोसलं आहे. कधी जातीय दंगली, दहशतवादी हल्ला तर कधी तस्करांचा अड्डा बनलेली ही मुंबई आता सर्वसामान्यांसाठी खूप सुरक्षित बनली आहे. अर्थात त्यामध्ये पोलिसांचा मोठा वाटा आहे. पण या मुंबईच्या गुन्हेगारी विश्वामध्ये डॉन म्हणून कुप्रसिद्ध असलेला दाऊद इब्राहिम हा एकेकाळी एका धूर्त महिलेला आई मानायचा. तो तिचं सारं काही ऐकायचा. अशाच एका धूर्त आणि माफिया महिलेची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहेत.

गुन्हेगारीला प्रोत्साहन देणं असा आमचा अजिबात हेतू नाही. पण मुंबईच्या इतिहासात अशा काही गोष्टी घडून गेल्या ज्याची माहिती सर्वांना व्हावी, हाच यामागचा प्रामाणिक हेतू आहे. ज्येष्ठ पत्रकार एस. हुसेन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकात दाऊद जिला आई मानायचा त्या जेनाबाई दारुवालीची कहाणी सांगितली आहे. हीच जेनाबाई दारुवाली कोण होती? ते आपण जाणून घेऊयात.

जेनाबाई कोण होती?

झैनाब उर्फ जेनाबाई! मुंबईच्या माफिया महिलांमध्ये नाव घेतलं जाणारी पहिली महिला. ही महिला फार धूर्त होती, असा इतिहास सांगतो. जेनाबाई हिचा जन्म 1920 मध्ये मुस्लीम मेमन हलाई कुटुंबात झाला. जेनाबाईचे वडील व्हिक्टोरीया गाडी चालवायचे. तेच त्यांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाहचं साधन होतं. जेनाबाई ही सहा भावंडांपैकी एक होती. मुंबईच महंमद अली रोडवरच्या डोंगरी येथील चाळीत एका खोलीत संपूर्ण कुटुंब राहायचं.

जेनाबाईचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग

1920 आणि 1930 च्या काळात मुंबईत स्वातंत्र्य लढ्यासाठी आंदोलने व्हायची. जेनाबाई हिनेदेखील स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग घेतल्याचं बोललं जातं. महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीची ती समर्थक होती, असं झैदी यांनी आपल्या पुस्तकात लिहीलं आहे.

Jenabai Daruwali

जेनाबाई 14 वर्षांची असताना तिचा निकाह मोहमद शाह दरवेशबरोबर झाला. निकाहनंतर ती डोंगरीतल्या चुनावाला बिल्डिंगमध्ये राहायला गेली. पती दरवेशचा छोटा लाकडाचा व्यवसाय होता. जेनाबाईला दरवेशपासून पाच मुलं झाली. खदिजा, इक्बाल, सलीम, कमाल आणि शम्मी अशी त्यांची नावे होती. स्वातंत्र्य पूर्व काळात ब्रिटिशांनी ‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरण अवलंबत हिंदू-मुस्लीम दंगली घडवून आणल्या. त्या काळात जेनाबाई हिंदूंना संरक्षण द्यायची. पण यामुळे तिला पतीकडून मारही खावा लागे.

फाळणीनंतर पती पाकिस्तानला गेला

देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. अखंड भारत हा दोन भागात विभागला गेला. जेनाबाईचा पती दरवेश हा पाकिस्तानला गेला. त्याने जेनाबाईला पाकिस्तान घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला. पण जेनाबाईने ऐकलं नाही. जेनाबाई आपल्या पाच लेकरांसह मुंबईतच राहिली होती.

जेनाबाई सुरुवातीला चावलवाली म्हणून प्रसिद्धीच्या झोतात

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबईत त्या काळात धान्य आणि तांदूळ यांची चणचण भासू लागली. त्या काळात जेनाबाईने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी झटपट पैसा कमवण्याचा रस्ता धरला. यासाठी तिने घाऊक धान्यविक्रेते आणि काळ्या बाजारात चढ्या दराने धान्य विकणारे दुकानदार यांच्यामधील दलाल म्हणून तिने काम केलं. परवनागीशिवाय धान्य साठवणं आणि त्याची विक्री करणं शिक्षापात्र गुन्हा होता. पण जेनाबाई ते काम करायचं. विशेष म्हणजे पोलिसांनी अनेकदा जेनाबाईच्या चुनावाला येथील घरी छापा टाकला. पण पोलिसांना कधीच तिच्यावर गुन्हा दाखल होईल इतका पुरावा मिळाला नाही.

जेनाबाई ही मेमन असल्याने तिला चांगली गुजराती बोलता यायची. तसेच बहुसंख्य धान्य व्यापारी आणि दुकानदार हे गुजराती असल्याने त्यांच्याशी व्यवहार करणं जेनाबाईला सोप्प जाई. याशिवाय तांदूळच्या व्यवसायामुळे ती ‘जेनाबाई चावलवाली’ म्हणून ओळखली जाऊ लागली.

जेनाबाई आणि वरदराजन मुदलियारची भेट

जेनाबाईने पुढे 1950 च्या सुमारास इक्बाल गांधी नावाच्या व्यक्तीसोबत पुनर्विवाह केला. तिचा धान्याचा व्यवसाय सुरुच होता. पण त्याने फार कमी पैसे मिळायचे. त्यामुळे जेनाबाईला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ बिस्मिला शाहबाबांचा पुरातन दर्गा आहे, तिथे वरदाराजन नावाचा व्यक्ती गरिबांना दानधर्म करायचा, अशी माहिती मिळाली. जेनाबाईने वरदाची भेट घेतली आणि त्याच्याकडे आपल्या बिकट परिस्थितीचं रडगाणं गायलं.

वरदाराजनची माणसं त्यावेळी मुंबईत दारु बनवण्याचे काम करत होते. मुंबईत त्या काळात दारुबंदी होती. अशावेळी वदराला देखील मदतीची गरज होतीच. त्याने जेनाबाईला दारुविक्रिचा प्रस्ताव ठेवला. सुरुवातीला जेनाबाईने नकार दिला. पण नंतर जेनबाईने त्याला होकार दिला. जेनाबाईच्या मदतीने वरदाने प्रचंड दारुची विक्री केली. तसेच पुढे वरदराजनने हाजी मस्तान आणि करीम लाला यांच्यासोबत दोस्ती केली. वरदानेच जेनाबाईची या दोघांशी ओळख करुन दिली.

जेनाबाईचे दाऊदच्या कुटुंबियांसोबत संबंध

दारुच्या व्यवसायातून जेनाबाईने अफाट पैसा कमावला. त्याचबरोबर वरदाराजन, करीम लाला आणि मस्तान यांच्यासोबत चांगले संबंध प्रस्थापित झाल्याने जेनाबाईला मुंबईतील माफियांमध्ये विशेष ओळख मिळाली. तिचा दबदबा वाढला. कुख्यात गुंडांसोबत संबंध असल्याने हळूबळू जेनाबाईचे पोलिसांसोबत चांगले संबंध प्रस्थापित झाले. ती पोलिसांची खबरी झाली. याच काळात तिचे पोलीस कॉन्स्टेबल इब्राहिम कासकर आणि त्याची पत्नी आमिना यांच्यासोबत ओळख झाली. हे इतके जवळचे झाले की तिच्या कुटुंबाचा भाग झाले. दाऊद इब्राहिम हा त्यांचाच मुलगा होता. तिचा दाऊद सोबत जिव्हाळा होता. दाऊद तिला आई मानायचा.

dawood ibrahim

जेनाबाईच्या घरात पोलिसांचा छापा

पोलिसांनी 1962 मध्ये जेनाबाईच्या घरावर छापा टाकला. तिचा सहकारी असलेल्या विकीच्या खोलीत पाण्याच्या टाकीत दारु आढळली. त्यामुळे जेनाबाईला अटक झाली. विशेष म्हणजे अटक झाल्यानंतर जेनाबाईची त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत भेट झाल्याची चर्चा समोर आली होती. त्यावेळी जेनाबाईने आपली गरिबीची परिस्थितीमुळे आपल्याला असे धंदे करावे लागत असल्याचं म्हटलं होतं. तिने खूप रंगवून आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर जेनाबाई ही पोलिसांची खबरी झाली होती.

जेनाबाईने दाऊदला वाचवलं

दाऊद हा त्या काळात तरुण होता. तो एका टोळीचा प्रमुख होता. त्याच्या मारामाऱ्या आणि गुंडगिरीमुळे त्याचे पोलीस कॉन्स्टेबल वडील इब्राहिम कासकर हे वैतागले होते. त्याच्या कृत्यांमुळे वडिलांनादेखील शरमेने मान खाली घालावे लागे. एकदा दाऊदने मनीष मार्केटमधील गुंड हमीद चूहा याच्यासोबत हाणामारी झाली. यात चूहा प्रचंड जखमी झाला. त्याला आयसीयूत दाखल करावे लागले होते. त्यावेळी इब्राहिम कासकर आपल्या मुलावर प्रचंड संतापले होते. दाऊद आठवडाभर घरी गेला नाही. पण जेनाबाईने त्यावेळी इब्राहिम कासकर आणि आमिना यांना समजावलं होतं. तसेच पोलीस अधिकाऱ्यांसोबतही मध्यस्थी केली होती. त्यामुळे दाऊद बचावला होता. त्यामुळे दाऊद जेनाबाईचं ऐकायचा.

जेनाबाईने आणलं सर्व गुन्हेगारांना एकसंघ

जेनाबाईने पुढे दाऊद इब्राहिम ज्या मुस्लीम टोळीच्या लोकांशी वाद घालायचा त्या सर्वांशी जेनाबाईने मध्यस्थी करत दाऊदसोत मैत्री करायला भाग पाडले. तसेच हाजी मस्तान आणि करीम लाला यांच्यासोबत दाऊची ओळख करुन दिली. पुढे पठाण टोळीचा मुख्य करीम लाला, त्याची टोळी, दाऊद, साबीर, माजिद कालिया, हुसेन सोमजी, दिलीप अजीज आणि हनिफ हे जेनाबाईच्या प्रयत्नांमुळे एक झाले. त्यांनी एकत्र पुढे गुन्हेगारी विश्वात काम केलं.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा