साखरेबरोबरच कांद्याच्या किंमतीतही वाढ झाली आहे. दररोजच्या वापरतील विविध डाळीही महागल्या आहेत. खाद्य तेलाच्या किंमती वाढत चालल्या आहेत आणि या सर्व वाढत्या किंमती पाहून सामान्य नागरिकांच्या डोक्यावरील तणाव आणि खिशावरील भारदेखील वाढत चालला आहे.
कांद्याच्या किंमती वाढल्या
21 ऑगस्ट 2026 रोजी कांद्याची किंमत 40.79 रुपये प्रति किलोग्राम होती. एका आठवड्यापूर्वी हाच कांदा 36.56 रुपये प्रति किलोग्राम किंमतीने विकला जात होता. एका आठवड्यात कांद्याच्या किंमतीत 4.23 रुपये प्रति किलोग्राम किंमतीची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर महिन्याभरात कांदा 5.92 रुपये प्रति किलोग्राम किंमतीने महागला आहे.
असे म्हंटले जात आहे की नवीन कांदा बाजारात उशीरा उपलब्ध झाल्यामुळे कांदा पुरवठ्यावर दबाव तयार झाला आहे, परिणामी किंमती वाढल्या आहेत.
खाद्य तेलाच्या किंमतीतही वाढ
भारतात खाद्य तेलाचा वापार मोठ्या प्रमाणात केला जातो. अशात गेल्या महिनाभरात खाद्य तेलाच्या किंमतीत 2 ते 3% ची वाढ नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पाल्म ऑइलच्या किंमतीत गेल्या 20 महिन्यांच्या उच्चांकावर आहेत. एकंदरीत, खाद्य तेलाच्या वाढत्या किंमतीच्या समस्यांना जगातील अनेक देश तोंड देत आहेत. भारत पाल्म ऑइल आयात करतो. अशात इंडोनेशिया देशात पडलेल्या दुष्काळामुळे पाल्म ऑइल महागले आहे आणि आयात कमी केल्यामुळे भारतातल्या खाद्य तेलाच्या पुरवठ्यावर दबाव तयार झाला आहे. परिणामी किंमती वाढल्या आहेत.
डाळीही महागल्या
उडीद डाळ, तूर डाळ, मूग असो वा हरभरा, डाळींच्या किंमतीमध्ये 1 ते 2 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. यंदा पेरणी क्षेत्र कमी झाल्यामुळे डाळीची निर्मिती कमी झाली आहे. त्याचबरोवर भविष्यात मान्सून कमी राहिला तर डाळींच्या किंमतीवर आणखीन परिणाम होण्याची शक्यता आहे.
सरकारी गोल्ड बॉन्ड रीडीम करण्याचे कॅलेंडर जारी! दोन वेगवेगळ्या तारखांमुळे उडतोय गोंधळ? समजून घ्या सोप्या भाषेतमहागाईत साखरेला विशेष स्थान!
साखर देशातील अनेक भागांमध्ये 70 रुपये प्रति किलोग्राम किंमतीने विकली जात आहे. गेल्या आठवड्यात साखरेच्या किंमतीत 7 रुपये प्रति किलोग्राम इतकी वाढ नोंदवण्यात आली तर महिन्याभरात साखर 17 रुपये प्रति किलोग्राम किंमतीने महागली आहे. देशातील बहुतेक मंडळींनी साखरेच्या वाढत्या किंमतीचे खापर इथेनॉलवर फोडले परंतु सरकारने ते सर्व दावे फेटाळून लावले. तसेच या वाढत्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी गाळप हंगाम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सरकारकडून देशात साखरेचा पुरवठा वाढवण्यात भर दिला जात आहे. देशात साखरेचा तुटवडा तयार झाला असून एका साखर निर्यातदार देशाला साखर परदेशातून आयात करण्याची वेळ आली आहे. तरीही या सणासुदीच्या दिवसांसाठी देशांतर्गत साठा उपलब्ध असून साखर वितरकांना सरकारच्या निर्देशाप्रमाणे स्वतःकडे ठराविक साठाच ठेवता येणार आहे.

