Headlines

gadchiroli car accident while returning home from funeral car falls into river two died on the spot 3 injured ; जावयाचे सरण विझण्यापूर्वीच दोघा चुलत सासऱ्यांचा अंत; कार नदीत कोसळून भीषण अपघात, महाराष्ट्र हळहळला


Gadchiroli Accident: मनाला चटका लावणारी बातमी… जावयाच्या अंत्यविधीवरुन घरी परतताना दोन चुलत सासऱ्यांवर काळाचा घाला. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातात ३ गंभीर जखमी आहेत.

car accident gadchiroli
car accident gadchiroli(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली: दोन दिवसांपूर्वी हत्या झालेल्या चुलत जावयाच्या अंत्यविधीला उपस्थित राहून, डोळ्यातील आसवे पुसत परतणाऱ्या नातेवाइकांवर वाटेतच काळाने झडप घातली. आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर बोरीजवळील दिना नदीच्या पुलावरून कार खाली कोसळली. यात चुलत सासरे आणि त्यांच्या चुलत भावाचा जागीच मृत्यू तर इतर तिघे जखमी झाले आहेत.

यादव विठ्ठलराव कोलपाकवार (७३) रा. आष्टी व त्यांचे चुलत बंधू सुनील मुरलीधर कोलपाकवार (५५) रा.बोरी (अहेरी) अशी मृतांची नावे आहेत.

नेमकं काय घडलं?
अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील रवींद्र तंगडपल्लीवार हे १८ जानेवारी रोजी दुपारपासून बेपत्ता झाले होते. १९ जानेवारीला सकाळी सिरोंचा मार्गावर कालिमाता मंदिराजवळ त्यांचा मृतदेह आढळला होता. आरोपीने त्यांची धारदार शस्त्राने हत्या केली होती. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यादव हे आपल्या चुलत जावयाच्या अंत्यविधीसाठी आले होते. त्यांच्यासोबत पोस्टमास्तर असलेले त्यांचे चुलत बंधू सुनील हेदेखील होते. अंत्यसंस्कार आटोपून सर्व जण कारने परतत होते. दुपारी दीड वाजताच्या सुमारास दिना नदीच्या पुलावरून कार नदीत कोसळली.

Maharashtra TimesCrime News : लग्न जमलं, दोघांचं भेटणं सुरु, तरुणीला केळवणला मुंबईला बोलावून शारीरिक संबंध; ऐनवेळी मुलाचे आई-वडील म्हणाले…
दीना नदीचा हा पूल सध्या वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. पुलाला संरक्षक कठडे नसल्याने चालकाला अंदाज आला नाही. परिणामी, कार अनियंत्रित होऊन थेट खोल नदीत कोसळली.

Maharashtra TimesBeed Crime: खळबळजनक! बीडच्या जंगलात ‘महादेव ॲप’चा आंतरराष्ट्रीय अड्डा! मध्यरात्री पोलिसांचा छापा; कोट्यवधींची उलाढाल उघड
तर एका दुसऱ्या घटनेत, समृद्धी महामार्गावर भरधाव आयशर समोरील वाहनाला धडकून चालक ठार झाला. मेहकर तालुक्यातील शहापूरजवळ चॅनेल क्रमांक २७४ वर १७ जानेवारीला पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. अजय सुभाष शर्मा, असे मृत चालकाचे नाव असून तो नाशिकच्या सिडकोमधील विजयनगर बसस्थानकाजवळ राहत होता. समृद्धी महामार्गाने एमएच-२५-जेडब्ल्यू-६८७८ क्रमांकाच्या वाहनाने निघाला होता.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा