हवामान विभागाने जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या होत्या. दुपारपर्यंत मुसळधार पाऊस होऊन नदी-नाले धोक्याच्या पातळीवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात केवळ हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या.
Gadchiroli News: सीमेवर माओवादी सक्रिय; तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात हायअलर्ट जारी, १६ पथकांकडून कोम्बिंग ऑपरेशन
गेल्या २४ तासांत सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक १११.२ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल अहेरी तालुक्यात ४०.७ मिमी पाऊस झाला. सिरोंचा तालुक्यातील पेंटिपाका मंडळात तब्बल १७६.५ मिमी, आसरल्ली येथे ११६.६ मिमी, सिरोंचा शहरात ८०.२ मिमी आणि बामणी येथे ७१.६ मिमी पावसाची नोंद झाली. अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे ९८.४ मिमी पाऊस झाला. दरम्यान, गडचिरोली, एटापल्ली, मुलचेरा, कुरखेडा, देसाईगंज, कोरची, आरमोरी आणि धानोरा तालुक्यांत दिवसभर रिमझिम सुरू असल्याने वातावरण ढगाळ राहिले.
मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने बुधवारी शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती. त्यातच आषाढी गुरुपौर्णिमेचा सण असल्याने घराघरांत गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांनी पावसात चिंब भिजत सुटीचा मनमुराद आनंद लुटला.
नागरिकांनी वाहत्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.
Mumbai Crime : आठ महिन्यांच्या श्वानाच्या पिल्लावर अमानूष अत्याचार, चेंबूरमध्ये विकृत मानसिकतेचं भयावह रुप; जगण्याची शाश्वती कमी
येडसिली गावात शिरले पाणी
सिरोंचा तालुक्यातील येडसिली गावात मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यावरील पुलाची क्षमता अपुरी ठरली आणि पुराचे पाणी थेट गावात घुसले. अनेक घरांच्या परिसरात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना कंबरभर पाण्यातून मार्ग काढावा लागला. शेतजमिनीही पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले आहे. या ठिकाणी अधिक उंचीचा आणि मोठ्या क्षमतेचा पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Maharashtra Politics : दिलीप वळसे पाटील शरद पवार यांच्या भेटीला, दोन्ही राष्ट्रवादीत नेमकं काय सुरु?
कोठा-पोचमपल्ली रपटा पाण्याखाली
गर्कपेठा ग्रामपंचायतअंतर्गत कोठा व पोचमपल्ली येथील रपटा पुराच्या पाण्याखाली गेल्याने वाहतुकीला फटका बसला. या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले असून तातडीने दुरुस्तीची मागणी सामाजिक कार्यकर्ते वसंत डुरके यांनी केली आहे. याशिवाय पेंटिपाका, रेगुंठा, पर्सेवाडा, कर्जेली, मोयाबिनपेटा, झिंगानूर, रमेशगुडम, लिंगापूर ढोला, गर्कपेठा आणि परिसरातील अन्य गावांमध्येही पुराचा धोका निर्माण झाला आहे.

