नीरजा चौधरी यांचा कॉलम:मंदिरातील ‘चोरी’मुळे समीकरणे बदलतील?
अयोध्येतील श्रीराम मंदिरातून झालेली कथित चोरी अभूतपूर्व आहे. या घटनेने भाजप आणि संघाचे कार्यकर्ते व समर्थकही हादरले आहेत. हे केवळ एखाद्या सामान्य मंदिरातील चोरीचे प्रकरण नाही. पूजास्थळी चोऱ्या होणे ही गोष्ट नवीन नाही आणि अनेकदा लोक ती सहनही करतात. पण राम मंदिर वेगळे आहे. येथील अर्पणाची रक्कम खूप मोठी होती. दिल्लीजवळ राहणाऱ्या त्या शेतकऱ्याप्रमाणेच लाखो…
