भिवंडीत चार मजली इमारत कोसळली, भीषण दुर्घटनेत चार जणांचा अंत; ढिगाऱ्याखाली ७-८ नागरिक अडकल्याची भीती| Maharashtra Times
Thane News: महापालिकेने धोकादायक घोषित केलेली एक इमारात गुरुवारी रात्री कोसळल्याने चार जणांचा अंत झाला आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ७-८ कामगार अजूनही अडकलेले आहेत. महेश गायकवाड, ठाणे: गुरूवारी रात्री भिवंडीमध्ये एक इमारत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. दि. ३o जुलै २०२६ रोजी भिवंडी तालुक्यातील मौजे नारपोली येथे एक घटना घडली. बालाजी नगर, गंगाराम वाडी येथील…
