Headlines

Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! 280 गावांत पूर; जनजीवन विस्कळीत, 4 हजार 913 घरांमध्ये पाणी – heavy rain wreak havoc in raigad 280 villages flooded life disrupted water enters 4913 houses


Raigad Heavy Rain: पाताळगंगा नदी इशारा पातळीवर वाहत आहे. सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

raigad
रायगड पाऊस(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, अलिबाग : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, गेल्या आठ दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ११ जणांचा मृत्यू, एक जण बेपत्ता तर तीन जण जखमी झाले आहेत. पूर, दरडी कोसळणे आणि पावसाच्या तडाख्यामुळे २८० गावांतील ४,९१३ घरांमध्ये पाणी शिरले असून ४० गावांतील १,७७८ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

महाड शहरात गेल्या चार दिवसांत तिसऱ्यांदा पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण आहे. रोहा शहरातदेखील सकाळी दुसऱ्यांदा पाणी शिरले. सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी १३४.१० मिमी पावसाची नोंद झाली असून, १ जुलैपासून आतापर्यंत एकूण १,१२३ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे सावित्री, अंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोका पातळी ओलांडली.

Maharashtra TimesMoshi Building Collapse: मोशीत मोठी दुर्घटना! कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला; 7 जणांची सुटका, 11 कामगार अजूनही ढिगाऱ्याखालीच
कर्जत तालुक्यातील आंबिवली पाझर तलाव अतिवृष्टीमुळे फुटल्याची घटना घडली. जीवितहानी टळली असली तरी सोलनपाडा, जांभरून आणि जाधवपाडा येथील नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. अतिवृष्टीमुळे ५५ ठिकाणी दरडी कोसळल्या, तर ७३ घरांजवळ दरडी आल्याच्या घटना घडल्या. रस्त्यांवरील दरडी हटवून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. आपदा मित्र, स्वयंसेवक, ट्रेकर्स, पोलीस आणि महसूल विभागाच्या संयुक्त मोहिमेतून २०० हून अधिक नागरिक व पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली.

जिल्ह्यातील ४२ रस्ते व पुलांचे नुकसान झाले असून ६८ रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. घाटमार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार बंद ठेवण्यात येत असून रेल्वेसेवा सुरू आहे. महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना अन्न व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. ५१ घरे पूर्णपणे, ८३८ घरे अंशतः, ७१ गोठे, २०३ दुकाने व हातगाड्या तसेच २९ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. याशिवाय ३३ जनावरे आणि तब्बल ४, २३६ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra TimesDevendra Fadnavis: मला शिव्या द्या, पण महाराष्ट्राला बदनाम करु नका! Missing linkवरुन मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
दूध, भाजीपाला पुरवठा विस्कळीत महाड-मुंबई राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत सुरू झाला असला, तरी आंबेनळी, भोर आणि ताम्हिणी घाट बंद असल्याने दूध व भाजीपाल्याचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. हेटवणे मध्यम प्रकल्प ७१.८० टक्के भरला असून जिल्ह्यातील २८ लघु प्रकल्पांपैकी १९ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा