Headlines

raigad fort steps closed for two days administrative order for the safety of tourist


शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 8 आणि 9 जुलैला नाणे दरवाजा आणि चित्तदरवाजा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Raigad News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : रायगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. पावसामुळे रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच दोन दिवस पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता असल्या कारणास्तव प्रशासनाने दोन दिवस किल्ले रायगडाचे पायरी मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

हवामान विभागाने महाड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात ८ आणि ९ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिवभक्तांच्या सुरक्षेला प्राधान्य देत या दोन दिवसांसाठी किल्ले रायगडावरील नाणे दरवाजा आणि चित्तदरवाजा पायरी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकारी पोपटराव ओमासे यांनी जारी केले आहेत.

मुसळधार पावसामुळे अपघाताचा धोका

प्रांताधिकारी ओमासे यांनी काढलेल्या लेखी आदेशानुसार, मुसळधार पावसामुळे किल्ल्यावरील डोंगरकड्यांवरून दरड कोसळणे, दगड आणि माती घसरणे तसेच पायऱ्यांवरून घसरून अपघात होण्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

पायरी मार्ग बंद करण्याचा निर्णय का घेतला?

गेल्या काही वर्षांत पावसाळ्यातही मोठ्या संख्येने शिवभक्त किल्ले रायगडावर दर्शनासाठी येत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. मात्र अतिवृष्टीच्या काळात पायरी मार्ग अत्यंत धोकादायक बनत असल्याने पर्यटक आणि शिवभक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्पुरती बंदी आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी किल्ल्याच्या प्रवेशद्वारांवर तसेच पायरी मार्गाच्या सुरुवातीला सूचना फलक लावण्यात येणार आहेत. महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या निर्णयाची अंमलबजावणी करतील. नागरिकांना आणि पर्यटकांना पायरी मार्गाने प्रवेश दिला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रशासनाचे शिवभक्तांना आवाहन

प्रशासनाने शिवभक्तांना आवाहन केले आहे की, ८ आणि ९ जुलै रोजी पायरी मार्गाने किल्ले रायगडावर जाण्याचे नियोजन करू नये. हवामान परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पुढील निर्णय जाहीर केला जाईल.

राजधानी रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडित अत्यंत महत्त्वाचा दुर्ग असून वर्षभर हजारो पर्यटक आणि शिवभक्त येथे भेट देतात. मात्र मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याचा विचार करून प्रशासनाने सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी पोपटराव ओमासे यांनी केले आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा