Headlines

पावसाळ्यात इडलीचं पीठ असं फरमेंट करा,फक्त एक ट्रिक वापरून तयार करा कापसासारख्या मऊसुत होईल इडली – how can i quickly ferment idli batter in rainy season


पावसाळ्यात थंड वातावरणामुळे इडलीचं पीठ पटकन फरमेंट होत नाही आणि इडल्या कधी कधी कडक होतात.पण एका सोप्या ट्रिकने पीठ लवकर फुगवून तुम्ही कापसासारख्या मऊ, शुभ्र आणि लुसलुशीत इडल्या बनवू शकता.योग्य साहित्य आणि योग्य पद्धतीने घरच्या घरी हॉटेलसारख्या परफेक्ट इडल्या तयार करा.

Idli Batter Fermentation
फोटो सौजन्य :- @iStock
पावसाळा सुरू झाला की घरात गरमागरम, मऊसुत आणि फुललेल्या इडलीची इच्छा प्रत्येकाला होते. पण या ऋतूमध्ये एक मोठी अडचण असते ती म्हणजे इडलीच्या पिठाचे योग्य फरमेंटेशन होणे. थंड हवामान आणि वातावरणातील ओलावा यामुळे इडलीचं पीठ नेहमीसारखं पटकन फुगत नाही. अनेक वेळा पीठ आंबायला वेळ लागतो किंवा इडली कडक, सपाट आणि चिकट होण्याची शक्यता असते.एका छोट्याशा ट्रिकचा वापर करून तुम्ही पावसाळ्यातही इडलीचं पीठ अगदी सहज फरमेंट करू शकता आणि कापसासारख्या मऊ, शुभ्र आणि लुसलुशीत इडल्या बनवू शकता. योग्य प्रमाणात साहित्य, योग्य पद्धत आणि फरमेंटेशनची छोटीशी काळजी घेतली तर घरच्या घरी हॉटेलसारख्या मऊ इडल्या तयार होतात. (फोटो सौजन्य :- @iStock)

इडलीचं पीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य

इडलीचं पीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य

जुने तांदूळ – 3 कप (सुमारे 500 ग्रॅम)
उडीद डाळ – 1 कप (सुमारे 200 ग्रॅम)
जाड पोहे – 2 कप (150 ते 200 ग्रॅम)
मेथी दाणे – अर्धा चमचा
मीठ – चवीनुसार
पाणी – आवश्यकतेनुसार

इडलीचं पीठ तयार करण्याची योग्य पद्धत

इडलीचं पीठ तयार करण्याची योग्य पद्धत

सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून 5 ते 6 तास पाण्यात भिजत ठेवा. उडीद डाळ आणि मेथी दाणे वेगळ्या भांड्यात धुवून त्याच वेळेस भिजवून ठेवा. पोहे इतर साहित्यापेक्षा कमी वेळ भिजवले तरी चालतात. पोहे साधारण 15 ते 20 मिनिटे पाण्यात भिजवून घ्या.सर्व साहित्य भिजल्यानंतर मिक्सरमध्ये किंवा ग्राइंडरमध्ये बारीक वाटून घ्या. उडीद डाळ वाटताना थोडं थोडं पाणी घालून ती हलकी आणि फुललेली वाटून घ्यावी. तांदळाचं पीठ थोडंसं रवा सारखं बारीक राहिलं तरी चालते. यामुळे इडलीला छान टेक्स्चर मिळते.सर्व वाटलेलं पीठ एका मोठ्या भांड्यात काढून चांगले मिसळा. फरमेंटेशनच्या वेळी पीठ फुगते, त्यामुळे भांडे मोठे असणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात पीठ पटकन फरमेंट करण्याची खास ट्रिक

पावसाळ्यात पीठ पटकन फरमेंट करण्याची खास ट्रिक

पावसाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे पीठ नैसर्गिकरित्या आंबायला जास्त वेळ घेते. यासाठी एक सोपी ट्रिक वापरा.तयार केलेले पीठ झाकण लावून थेट थंड जागी न ठेवता कोमट जागी ठेवा. यासाठी ओव्हन, मायक्रोवेव्ह किंवा कॅसरोलचा वापर करता येतो. ओव्हन फक्त 2 ते 3 मिनिटे हलका गरम करून बंद करा आणि त्यामध्ये पीठाचे भांडे ठेवा. किंवा मोठ्या कॅसरोलमध्ये गरम पाणी ठेवून त्याच्या वर पीठाचे भांडे ठेवा.

मऊसुत इडलीसाठी पीठ वापरण्यापूर्वीची तयारी

मऊसुत इडलीसाठी पीठ वापरण्यापूर्वीची तयारी

फरमेंट झालेले पीठ हलक्या हाताने एकदा मिसळा. त्यातील हवा जास्त प्रमाणात निघून जाऊ देऊ नका, कारण हीच हवा इडलीला मऊ आणि स्पॉंजी बनवते.आता चवीनुसार मीठ घाला. काही लोक फरमेंटेशनपूर्वी मीठ घालतात, तर काही फरमेंटेशननंतर. पावसाळ्यात चांगले फरमेंटेशन हवे असल्यास मीठ नंतर घालणे अनेकांना अधिक सोयीचे वाटते.

पांढरी शुभ्र आणि लुसलुशीत इडली बनवण्याची पद्धत

पांढरी शुभ्र आणि लुसलुशीत इडली बनवण्याची पद्धत

इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. इडलीच्या साच्यांना थोडे तेल लावून घ्या, त्यामुळे इडल्या सहज बाहेर निघतात. तयार इडलीचे पीठ साच्यांमध्ये भरा आणि मध्यम आचेवर साधारण 10 ते 15 मिनिटे वाफवून घ्या. इडली जास्त वेळ वाफवल्यास ती कोरडी होऊ शकते, त्यामुळे वेळेची काळजी घ्या.इडली शिजली आहे की नाही हे पाहण्यासाठी टूथपिक किंवा सुरीचा वापर करा.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा