Headlines

Youth Emotional in Chhatrapati Sambhajinagar After One Tree Cut by Unknown Person


छत्रपती संभाजीनगरच्या गोगाबाबा टेकडीवर असणाऱ्या एका बांभळीचे झाड कुणीतरी अज्ञात इसमाने कुऱ्हाडीने तोडलं. या झाडासोबत हजारो तरुणांच्या भावना होत्या. या झाडाची कुणी अज्ञात व्यक्तीने कत्तल केल्याने अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.

one tree
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : ज्या शहराला ५२ दरवाजांचा आणि डोंगरांच्या कुशीत वसलेला ऐतिहासिक वारसा लाभलाय, त्या छत्रपती संभाजीनगर शहरातल्या हजारो तरुण-तरुणींच्या हृदयाचा एक तुकडा शनिवारी पहाटे तुटला. माणसांच्या जगात सहसा दुर्लक्षित राहिलेल्या, काटेरी म्हणून नाकारल्या गेलेल्या एका साध्या बाभळीच्या झाडाने शहरातल्या हजारो दिलांना जिंकले होते. गोगाबाबा टेकडीच्या शांत, निसर्गरम्य एकांतात चिमुकल्या तलावाकाठी एकाकी उभं असलेलं ते ‘वन ट्री’ ( One Tree )… कित्येकांच्या प्रेमाची साक्ष होतं, कित्येकांच्या एकांतवेळेचा हक्काचा सोबती होतं आणि कितीतरी कॅमेऱ्यांच्या फ्रेममधला तो सर्वांत सुंदर श्वास होतं. मात्र, पहाटे कुणाच्या तरी क्रूर आणि निर्दयी कुऱ्हाडीने त्या निष्पाप झाडाचा बलिदान घेतला आणि अख्ख्या शहराच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.

एरव्ही गुलाबाच्या फुलांना आणि बहरणाऱ्या झाडांना डोक्यावर घेणाऱ्या या जगात, एका काटेरी बाभळीने छत्रपती संभाजीनगरकरांना वेड लावले होते. डोंगराच्या उंच माथ्यावर वाऱ्याच्या झुळकीसोबत डुलणारे ते झाड म्हणजे फक्त एक वनस्पती नव्हती; तर ट्रेकिंग करत थकलेल्या तरुणाईला मायेची सावली देणारा आणि छायाचित्रकारांच्या स्वप्नांना नवी फ्रेम देणारा जिवंत मित्र होता. रोज सकाळी आणि विशेषतः रविवारी, शेकडो पावले या ‘वन ट्री’च्या प्रेमापोटी टेकडीची पायवाट चढायचे. कित्येक मित्रांच्या गप्पा, प्रेमिकांचे अबोल शब्द आणि स्वतःच्या शोधात निघालेल्या एकाकी मनांचा ते एकमेव आधार होते.

तरुण ट्रेकिंगसाठी गेले अन् तिथे पोहोचताच पसरला सन्नाटा

भल्या पहाटे जेव्हा काही तरुण ट्रेकिंगसाठी नेहमीच्या उत्सुकतेने गोगाबाबा टेकडीवर पोहोचले, तेव्हा तिथे आनंदाऐवजी काळीज पिळवटून टाकणारा सन्नाटा पसरला होता. ज्या झाडाशी फोटो काढण्यासाठी रांगा लागायच्या, ते झाड जमिनीवर कुऱ्हाडीने छिन्नविछिन्न होऊन पडलेले होते. माणसाच्या विकृत स्वार्थाचा आणि रागाचा बळी ठरलेली ती बाभळ जमिनीवर निपचित पडली होती.

हे दृश्य पाहताच तिथे जमलेल्या अनेक तरुणांचे आणि निसर्गप्रेमींचे डोळे पाणावले. “ज्याने आम्हाला कधीच काही मागितलं नाही, उलट नेहमी आनंद दिला, त्याची अशी निर्घृण हत्या कुणी कशी करू शकतं?” असा प्रश्न विचारताना प्रत्येकाचा आवाज दाटून येत होता.

सोशल मीडियावर ‘त्या’ सोबत्याला निरोप; अश्रू अन् संताप

झाड तोडल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि प्रत्येकाच्या आठवणींच्या पटलावर गोगाबाबा टेकडीवर काढलेला तो एक फोटो तरळून गेला. सोशल मीडियावर या ‘वन ट्री’च्या आठवणींचे आणि त्याला दिलेला निरोप देणाऱ्या पोस्ट्सचा पूर आला आहे. अनेक कलाकारांनी या झाडाची दुःखी ‘आत्मकथा’ कवितेतून मांडली आहे, तर हजारो तरुणांनी #OneTree #SaveNature असे हॅशटॅग वापरत संताप व्यक्त केला आहे. एक झाड तुटले नाही, तर छत्रपती संभाजीनगरकरांच्या भावनांचा, आठवणींचा आणि एका सुंदर नात्याचा अंत झाला आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा