![]()
स्वामी विवेकानंद आणि स्वामी रामतीर्थ यांना संपूर्ण जगात गौरवमिळाला. त्यांनाच स्वतःच्या देशात योग्य मान मिळाला नव्हता. ते दोघेहीम्हणत असत की प्रशंसेचे प्रमाणपत्र घ्यायचे असेल तर परमेश्वराकडूनघ्या; जग काय देणार? माणसाची सर्वात मोठी कमजोरी म्हणजेअहंकार. या अहंकाराचे प्रशंसा हे अन्न आहे. अहंकारी व्यक्तीला सर्वत्रस्वतःची स्तुती व्हावी, स्वतःला मान मिळावा असे वाटते. माणसाचीसर्वांत मोठी कमजोरी म्हणजे अहंकार. स्वतःबद्दलचा अति अभिमानत्याला वास्तवापासून दूर नेतो. माणूस स्वतःलाच सर्वश्रेष्ठ समजूलागतो. दुःखाचे एक अदृश्य कारण अहंकारही आहे. एक छोटा प्रयोगकरून पाहा. मार्कर पेनने बर्फाच्या छोट्या तुकड्यावर ‘मी’ असे लिहाव थोडा वेळ पाहा. ते वितळेल, पुसले जाईल. आणखी एक प्रयोगश्वासाशी संबंधित आहे. डोळे बंद करा. भुवयांच्या मधोमध असलेल्याआज्ञाचक्रावर मन केंद्रित करा. ‘मी’ हा शब्द पाहा. मग दीर्घ श्वास घ्याव पुन्हा ‘मी’ हा शब्द पाहा. श्वास सोडताना त्या ‘मी’ला वितळतानापाहा. ही क्रिया तीन-चार वेळा करा. तुम्हाला जाणवेल की ‘मी’ पणाकमी होत आहे. ‘मी’ कमी होत जाईल. अहंकारही नाहीसा होईल.अहंकाराचा निरोप म्हणजेच जगातील सर्व सुखांचा मार्ग आहे.
Source link
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:अहंकाराला निरोप म्हणजेच जीवनातील सर्व सुखांचा मार्ग
