देशाच्या 70% भागात ढगाळ वातावरण:25 जुलैपर्यंत पावसाचा अलर्ट; राजस्थानच्या 3 जिल्ह्यांतील पारा 41 डिग्रीच्या वर
इस्रोच्या उपग्रह प्रतिमांनुसार, देशाच्या सुमारे 70% भागावर मान्सूनचे ढग दाटले आहेत. पुढील 25 जुलैपर्यंत उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतासह देशाच्या 60% पेक्षा जास्त भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. आतापर्यंत मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा 24% कमी आहे. राजस्थानमध्ये मान्सूनने विश्रांती घेतल्याने उष्णता वाढू लागली आहे. बिकानेर विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये रविवारी तापमान 41 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले….
