Headlines

महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, संपूर्ण आठवडा विजांचा कडकडाट होणार; मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार?| Maharashtra Times


Weather Alert: संपूर्ण आठवडा राज्यात मान्सूनचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रावर पावसाचे ढग दिसू लागले आहेत. २० जुलै रोजी कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे?

maharashtra weather forecast on 20th july 2026 imd issues yellow alert for mumbai heavy rain with thunderstorm in state
मुंबई: राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून या आठवड्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. २० जुलै रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे. याशिवाय मुंबई महानगर प्रदेशात देखील रविवारी रात्रभर धो-धो पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने सकाळी ७ वाजता जाहीर केलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे आणि रायगड या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. राजस्थानच्या श्री गंगानगरपासून रोहतक, हरदोई, वाराणसी, रांची, सागार बेटे ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत १.५ किलोमीटर उंच कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. शिवाय मध्य प्रदेशात समुद्राच्या सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर, उत्तर आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. या सर्व प्रणालींमुळे महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांने पुन्हा वेग पकडला आहे.

Maharashtra TimesWeather Update: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, कोकणात ४८ तासांत पाऊसधारा; १६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

मुंबई-पुण्यातील हवामान

मुंबई, ठाणे जिल्ह्यांमध्ये सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता आहेत. हवामान विभागाने सकाळी सात वाजता सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यासह पुणे जिल्ह्यातही घाटमाथ्यावर आज जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकणातील हवामान कसं असेल?

पावसाचा जोर ओसरला होत तेव्हाही कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी पाऊस सुरू होता. २० जुलै रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशातील हवामान कसं असेल?

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये सोमवारी हलक्या पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातही पावसाचा जोर कमीच राहील पण घाटमाथ्यावर मध्य वादळी वाऱ्यांसह मध्यम पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातही पावसाचा जोर कमीच राहील

पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मेघगर्जनेसह कोसळणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. साताऱ्यात घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्याती हवामान जाणून घ्या

मराठवाड्यातही या आठवड्यात मोसमी वाऱ्यांचा वेग वाढला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

Maharashtra TimesPune News: पुण्यात नव्या बोगद्याने सिंहगड-सातारा रस्ता जोडणार, प्रवासाचा वेळ ५० मिनिटांवरून १० मिनिटांवर येणार

विदर्भातील हवामान कसं राहील ?

संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असला तरी विदर्भातील वातावरण अजून कोरडचं आहे. रविवारी काही ठिकाणी हलका पाऊस झाला असला तरी सोमवारी पावसाची शक्यता फार कमी आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत वातावरण शांत असेल. हवामान विभागाकडून कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.

तुमच्या जिल्ह्यांत सोमवारी हवामान कसं आहे? पावसाने काही दिवस दडी मारल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने कोणत्या योजना सुरू केल्या पाहिजेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा!

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा