उद्धव ठाकरे सेना मुक्त महाराष्ट्र झालाय, अशा शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी डिवचलंय. बोटावर निवडणून आलेली माणसं सुद्धा आता तुमच्याकडे राहायला तयार नाहीत, असा खोचक टोलाही महाजनांनी ठाकरेंना लगावला. तर टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात सरकारने गंभीरता दाखवली असून या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले.