![]()
मला माझ्यासाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी स्वतःस्वयंपाक करण्याची वेळ क्वचित आली आहे. भारतीयसमाजात महिलेसाठी ही अत्यंत दुर्मीळ बाब मानलीजाईल. त्या अर्थाने मी विशेषाधिकार लाभलेली आहे.माझे दिवंगत पती व प्रसिद्ध पत्रकार-लेखक कांती भट्टयांना स्वयंपाक करता येत असे. त्यांना त्यांच्याआवडीचे ‘कच्चा-पक्का जेवण’ खायचे असे, तेव्हा तेस्वतःसाठी स्वयंपाक करत. त्यांच्या हातची दुधीभोपळ्याची भाजी चांगली झाल्यास त्या आनंदाला वाचकांना सांगितल्याशिवाय त्यांना राहवत नसे. दुसऱ्या दिवशीच्या त्यांच्या दैनिक स्तंभात त्याचा उल्लेखहमखास असे. ते अन्नाकडे नेहमी व्यापक दृष्टिकोनातून पाहत असत. हे थोडे विचित्र वाटू शकते. पण रोजचे जेवण मेहनत न करता ताटात मिळणे म्हणजे समाधानाची हमी नाही. विशेषतः ऑनलाइन अन्न मागवून देणारे ॲप्सआल्यापासून मला अधिक जाणवू लागले आहे कीस्वतः स्वयंपाक करण्यात किंवा प्रियजनांसाठी जेवण बनवण्यात एक विलक्षण सौंदर्य असते. मी या ॲप्सचावापर करते, तितकी घरच्या जेवणाची किंमत अधिकजाणवते. आणि अर्थातच आपण सर्वजण आपल्याआईच्या हातच्या जेवणाचे चाहते असतो. माझ्याहीमनात आईच्या हातच्या जेवणाच्या असंख्यअविस्मरणीय आठवणी आहेत. गेल्या चार दशकांत मीमाझ्या जेवणाबाबत कधीच पूर्णपणे समाधानी राहिलेनाही. याचे मोठे कारण म्हणजे माझी आई अप्रतिमस्वयंपाकी होती. लग्नानंतर तिच्या हातच्या चविष्टपदार्थांना मी कधीच विसरू शकले नाही. 1979 मध्येम्हणजे तब्बल 47 वर्षांपूर्वी मी आईचे घर सोडले. पणतिच्या हातच्या अन्नाची चव आजही जिभेवर रेंगाळते.या भावनेचे शास्त्रीय विश्लेषण करण्याइतकी माझ्याकडेक्षमता नाही. पण त्या चवीची आठवण आजही डोळेपाणावून का टाकते, हे मला माहीत आहे. माझा ठामविश्वास आहे की आई स्वयंपाक करताना त्यात आपलेसंपूर्ण मन ओतते. तिचे मन सतत विचार करत असेआणि तिचे हात असे काहीतरी बनवत असत की कठीणप्रसंगातही मनाला दिलासा मिळे. मी खट्टू झाले की आईमाझ्या आवडीचे दहीवडे बनवत. हसऱ्या चेहऱ्यानेमाझ्यासमोर वाढत असे. आयुष्याच्या अशा टप्प्यावर मीआहे. येथे मला आवडती कार किंवा कपडे विकत नघेतल्याची खंत नाही. पण आईला ‘मेथी नुं वेषण’ कसेबनवायचे, हे मी कधी विचारले नाही, याची खोल खंतआहे. आई ताजी मेथीची पाने बेसनाच्या पिठासोबतशिजवत असे. कधी ती कोरडी भाजी बनवत असे, तरकधी त्यात ताक घालत असे. हिंग आणि मोहरीच्याबारीक फोडणीने ती मेथीची चव अप्रतिम संतुलित करतअसे. एकदा माझ्या पतींनी एक खंत व्यक्त केली होती. माझे व आईचे नाते परिपक्व आहे. तितके आम्हापती-पत्नीचे होऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले होते.मी त्यांना विचारले, ‘का?’ त्यावर कांती म्हणाले,‘कारण तिच्या हातच्या जेवणाने तुला तिच्याशी घट्टबांधून ठेवले आहे.’ आईच्या हातच्या पोळ्यांचे वर्णनकरायचे झाले तर तिने गुजराती रोटली बनवण्याच्याकलेत पूर्ण प्रावीण्य मिळवले होते. ती नेहमी गव्हाचीपोळी बनवत असे. मऊसर कणकेचा गोळा तिच्यालाटण्याखाली एका ठरावीक लयीत गोल फिरत असे.तिचे ते भांडे नेहमी चुलीजवळच ठेवलेले असे.मुंबईतील तिच्या स्वयंपाकघरात तब्बल ५५ वर्षांत त्यापात्राची जागा कधी बदलली नाही. तव्यावर भाजली कीपोळी अगदी परिपूर्ण गोल आकारात फुलत असे. रेशमासारखी मऊ, तोंडात टाकताच विरघळणारी.तिच्या पोळ्या कागदाइतक्या पातळ असत. आईच्याहाताच्या स्पर्शाशिवाय कोणतेही जेवण माझ्यासाठीदहापैकी दहा गुणांचे ठरले नाही. लग्नानंतर मी रोजतिच्या हातच्या जेवणापासून दूर असल्याचे दुःख तिलापूर्णपणे समजत होते. तिच्या पोळ्यांनी माझे खूप लाडकेले होते. एकदा तिने मला सल्ला दिला की माझ्यापंजाबी घरमालकीणीला तिच्यासारख्या पोळ्याबनवायला सांग. त्यावर मी आईला म्हणाले, ‘मी त्यांनाकसे सांगू की मला पोळी खायला आवडते. जाडसरपोळी नाही! (हे लेखिकेचे वैयक्तिक विचार आहेत.) लग्नानंतरही मी आईने बनवलेले गुजरातीपदार्थ, त्यांची चव व तिच्या हातची पोळीकधीच विसरू शकले नाही. आईच्याहातच्या अन्नाची ही ओढ भारतात काहीअसामान्य नाही. बहुतांश मुलांसाठीआईचे जेवण हेच पाककलेचे सर्वोच्चमापदंड असते.
Source link
शीला भट्ट यांचा कॉलम:आईच्या हाताची जेवणाची चवकधीही विसरता येत नाही!
