आयुष्यात प्रेरणा घ्यावी म्हणजे नेमकी कुणाची घ्यावी हे जळगावच्या कांचन महाजन नावाच्या तरुणीने दाखवून दिलं आहे. काचंन हिने एमपीएससी परीक्षेत 23 व्वा रँक मिळवत ‘राज्य कर निरीक्षक’ पदी बाजी मारली आहे. कांचनच्या वडिलांचं 19 वर्षांपूर्वी निधन झालं. आईने मोलमजुरी करुन मुलीला वाढवलं. त्याच मुलीने आज आईच्या कष्टाचं चीज केलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव : ज्या हातांनी आयुष्यभर दुसऱ्याच्या शेतात खुरपणी केली, उन्हातान्हात कष्ट उपसले, आज त्याच आईच्या हातांनी आपल्या लेकीच्या डोक्यावर यशाचा गुलाल उधळला. वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही हिंमत न हारता, केवळ आईच्या घामाचे चीज करण्यासाठी अहोरात्र एक करणाऱ्या कांचन महाजन यांनी MPSC परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे. त्यांची ‘राज्य कर निरीक्षक’ (STI) पदी निवड झाली आहे. एका शेतमजूर आईच्या संघर्षाचे रूपांतर आज स्वाभिमानाच्या सुवर्णक्षणात झाले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या STI (सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर) पदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. कांचन जयंत महाजन यांनी ओबीसी प्रवर्गातून 23 व्या क्रमांकाने दैदिप्यमान यश मिळवत STI पदावर निवड झाली आहे. कांचनच्या या यशाची बातमी समजताच कुटुंबीयांनी आनंदोत्सव साजरा केला.
कांचन यांच्या वडिलांचे 19 वर्षांपूर्वी निधन
कांचन महाजन हिने बी.एस्सी.पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या वडिलांचे 19 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आई हेमलता महाजन यांच्या खांद्यावर आली. एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोन्ही मुलांचे पालनपोषण करण्यासाठी हेमलता महाजन यांनी परिस्थितीशी दोन हात करत शेतात शेतमजुरी केली. उन्हाची, पावसाची आणि कष्टाची पर्वा न करता त्यांनी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले.
आईने लेकरांसाठी जीवाचं रान केलं
समाजात असे म्हटले जाते की वडील हे मुलांचे आधारस्तंभ असतात. कांचनचा तोच आधार 19 वर्षांपूर्वी हरपला. पण आई त्यांच्यासाठी ढाल बनवून उभी राहिली. वडिलांचे निधन झाले आणि नियतीने मोठा आघात केला. पण, खचून न जाता आईने स्वतःच्या दुःखाला बाजूला सारत संसाराचा गाडा हाकला. दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून, दिवस-रात्र घाम गाळून आईने कांचन यांच्या पाठीशी भक्कम ढाल बनून उभे राहणे पसंत केले. “पोटाला पीळ पडला तरी चालेल, पण लेकीच्या शिक्षणात खंड पडू देणार नाही,” या एकाच ध्येयाने आईने आयुष्यभर कष्ट उपसले.
आईच्या या संघर्षाला कांचनने आपल्या जिद्दीची आणि मेहनतीची जोड दिली. अनेक अडचणी, आर्थिक परिस्थिती आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. अखेर एमपीएससीच्या अंतिम निकालात 23 वा क्रमांक मिळवत तिने आपल्या आईच्या कष्टाचे चीज केले.
आईच्या कष्टामुळेच शिखर गाठले
“आईने केलेल्या कष्टांमुळेच आज मी या यशाच्या शिखरावर पोहोचले,” अशी भावना कांचन महाजन यांनी व्यक्त केली. आपल्या यशानंतर त्यांनी युवक-युवतींना प्रेरणादायी संदेश देताना सांगितले की, “आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि आपण करत असलेल्या मेहनतीवरही विश्वास ठेवा. नैराश्यात जगू नका. आजच्या हायटेक युगात युवक-युवतींसमोर यशाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. गरज आहे ती त्या संधी ओळखून जिद्दीने प्रयत्न करण्याची.”
कांचन यांची भावूक करणारी प्रतिक्रिया
“वडिलांचे मी 5 वर्षाची असतांना निधन झाले. मला एक भाऊ कुणाल महाजन त्याचे देखील MBA चे शिक्षण आईने पूर्ण केले. आई दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून आम्हला सांभाळायची आणि आमचे शिक्षण पूर्ण केले. माझे हे यश कोणत्याही पुस्तकातून किंवा क्लासमधून आलेले नाही, तर ते माझ्या आईच्या शेतातील घामातून आले आहे. तिने माझ्यासाठी स्वतःची स्वप्ने मारली. आज मी जे काही आहे, ते फक्त आणि फक्त तिच्या त्यागामुळे आहे”, असं कांचन महाजन म्हणाल्या.
कांचन यांचं यश तरुणांना प्रेरणा देणारं
कांचन महाजन यांच्या या यशामुळे विधवा आईच्या संघर्षाला, मुलीच्या जिद्दीला आणि मेहनतीला मिळालेला हा विजय म्हणून रावेर शहरात त्यांच्या कुटुंबाचे कौतुक होत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले कांचनचे यश अनेक विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा