![]()
निवडणुकांमधील पैसा तर अमाप असतोच. पण मंदिरांमधील पैसाही हिशोबाशिवाय वापरला जाऊ लागतो. तेव्हा चिंता वाटणे स्वाभाविक आहे. आजच्या काळात धर्मसुद्धा पैशांशिवाय चालू शकत नाही. म्हणूनच साधूंनी पैशांचा वापर करताना खूप काळजी घेतली पाहिजे. निसर्ग त्यांच्याकडून करून घेतो, तेच संत करतात. महात्म्यांचेएक तत्त्व असते—काही गोष्टी स्वतः करा व काही गोष्टी घडत जाऊद्या. राम मंदिरात घडलेल्या गोष्टींत काही लोक रामकाजच करत होते.पण मध्येच रावण आला तर काय करणार? रावण हा हनुमंतांनाघाबरतो. आयुष्यात कधी कठीण काळ आल्यास किंवा चुकीचे खापरआपल्यावर फुटले तर हनुमान चालीसाचा आधार घ्यावा. हनुमानचालीसाची प्रत्येक ओळ हा एक मंत्र आहे. हा मंत्र आत्मविश्वासजागा करतो आणि संरक्षण देतो. रक्षाबंधनाच्या आधी इंदूरमध्ये ‘एकशाम रिश्तों के नाम” या कार्यक्रमात श्री हनुमान चालीसाचे सामूहिकपठण केले जाते. माता-भगिनींनी आत्मविश्वास वाढवण्यासाठीरक्षाबंधनाच्या दिवशी हनुमंताला राखी नक्की बांधावी किंवा अर्पणकरावी.
Source link
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:साधूंनी पैशांचा वापर करताना दक्षता बाळगायला पाहिजे
