Headlines

नाशिकमध्ये २८ रस्त्यांना मंजुरी, छत्रपती संभाजीनगर ते पुणे रस्त्याला निधी; कुठून-कसे असतील मार्ग?| Maharashtra Times


म.टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने २८ रस्त्यांना मंजुरी देतानाच तपोवनातील महत्त्वाच्या जनार्दन स्वामी मठ-लक्ष्मी नारायण मंदिर पूल ते ड्रीम सिटी चौक रस्त्याला अखेर सुधारित मान्यता दिली आहे. त्यामुळे या दोन्ही महामार्गांची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढणार आहे.

या रस्त्यांच्या रुंदीकरणासह डांबरीकरणासाठी प्राधिकरणाने अवघा १५ कोटींचा निधी मंजूर केला होता. परंतु, १५ कोटींत या रस्त्याचे काम होऊ शकत नसल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने प्राधिकरणाकडे फेरप्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर प्राधिकरणाने या रस्त्यासाठी ३० कोटींचा निधी मंजूर केल्याने सिंहस्थापूर्वी रस्त्याच्या डांबरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Maharashtra TimesPune News: पुण्यात ३६ किमी लांब ‘उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग’, उन्नत मार्गावरून टोल-मुक्त प्रवास; कसा असेल प्रकल्प?

नाशिकमध्ये सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर भाविक, साधू-महंतांच्या सुविधेसाठी विविध कामे करण्यासाठी पालिकेने १५ हजार कोटींचा आराखडा सादर केला होता. त्यात जनार्दन स्वामी मठ, लक्ष्मीनारायण पूल ते ड्रीम सिटी दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १५ कोटींचा निधी मंजूर केला होता. परंतु, या निधीतून रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरण शक्य नसल्याचा दावा महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी प्राधिकरणाकडे केला होता.

या रस्त्यांसाठी ३० कोटींचा निधी

तपोवनाला जोडणारा जनार्दन स्वामी मठ ते ड्रीम सिटी चौक हा रस्ता सिंहस्थासाठी महत्त्वाचा असल्याने त्याच्या कामासाठी ३० कोटींचा निधी मिळावा अशी मागणी महापालिकेने केली होती. अखेर प्राधिकरणाने महापालिकेच्या मागणीला मंजुरी दिली असून, या रस्त्यासाठी ३० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली.

शहरांसाठी अर्बन चॅलेंज फंड

‘शहरांना विकासाचे केंद्र मानून त्यांच्या प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी ‘अर्बन चॅलेंज फंड’च्या माध्यमातून विकास करण्यात यावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल’, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Maharashtra TimesNavi Mumbai International Airport: सहा महिन्यांनंतर नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवा, अबू धाबीला पहिली झेप; कसा असेल पहिला टप्पा?

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ‘वर्षा’ निवासस्थानी नगर विकास विभागाच्या आढावा बैठकीत अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करताना महाराष्ट्राने या दृष्टीने पावले टाकली असून, यापूर्वी नाशिक आणि पुणे महानगरपालिकेत या धर्तीवर निधी उभारणी करून पाणीपुरवठा आणि स्वच्छतेला बळ देण्यात आले आहे. या महानगरपालिकांच्या निधी उभारणीसाठी राष्ट्रीय सर्वोच्च समितीची मंजुरी मिळाली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड आणि नागपूर महापालिका येथील काही प्रकल्पांना या पद्धतीने निधी उपलब्ध होणार आहे’, असे त्यांनी यावेळी सांगितले.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत