Nashik Bus Accident : येवला-नांदगाव मार्गावर मंगळवारची सकाळ काळजाचा थरकाप उडवणारी ठरली. या मार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झाला. सोमठाणे घाटात मध्य प्रदेशातील लक्झरी बसचा आज सकाळी अपघात झाला. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार 25 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

नियंत्रण सुटलं आणि बस उलटली
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही खासगी लक्झरी बस मध्य प्रदेशातील होती. आज सकाळी सोमठाणे जोश घाटातून जात असताना, अचानक चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस घाटातच उलटली. अपघाताच्यावेळी बसमध्ये सुमारे 20 ते 25 प्रवासी प्रवास करत होते. बस उलटल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ आणि किंकाळ्या ऐकायला मिळाल्या.
Pune Water Cut: पुणेकरांचे हाल होणार! शहरात पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा; पाणीकपात कधीपासून लागू करणार?
या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 5 ते 6 प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात एवढा भीषण होता की, लक्झरी बस थेट रस्त्याच्या मधोमध आडवी झाली. यामुळे येवला-नांदगाव रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. पोलीस प्रशासनाकडून बस बाजूला करण्याचं आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
दोन्ही महामार्गांची कनेक्टिव्हिटी वाढणार
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने २८ रस्त्यांना मंजुरी देतानाच तपोवनातील महत्त्वाच्या जनार्दन स्वामी मठ-लक्ष्मी नारायण मंदिर पूल ते ड्रीम सिटी चौक रस्त्याला अखेर सुधारित मान्यता दिली आहे. त्यामुळे या दोन्ही महामार्गांची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढणार आहे. या रस्त्यांच्या रुंदीकरणासह डांबरीकरणासाठी प्राधिकरणाने अवघा १५ कोटींचा निधी मंजूर केला होता. परंतु, १५ कोटींत या रस्त्याचे काम होऊ शकत नसल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने प्राधिकरणाकडे फेरप्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर प्राधिकरणाने या रस्त्यासाठी ३० कोटींचा निधी मंजूर केल्याने सिंहस्थापूर्वी रस्त्याच्या डांबरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Maharashtra Weather: ऐन जुलै महिन्यात राज्यात कोरडं वातावरण, पण येत्या आठवड्यात पाऊस धुमाकूळ घालणार; हवामान विभागाचा अंदाज
नाशिकमध्ये सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर भाविक, साधू-महंतांच्या सुविधेसाठी विविध कामे करण्यासाठी पालिकेने १५ हजार कोटींचा आराखडा सादर केला होता. त्यात जनार्दन स्वामी मठ, लक्ष्मीनारायण पूल ते ड्रीम सिटी दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १५ कोटींचा निधी मंजूर केला होता. परंतु, या निधीतून रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरण शक्य नसल्याचा दावा महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी प्राधिकरणाकडे केला होता.
तपोवनाला जोडणारा जनार्दन स्वामी मठ ते ड्रीम सिटी चौक हा रस्ता सिंहस्थासाठी महत्त्वाचा असल्याने त्याच्या कामासाठी ३० कोटींचा निधी मिळावा अशी मागणी महापालिकेने केली होती. अखेर प्राधिकरणाने महापालिकेच्या मागणीला मंजुरी दिली असून, या रस्त्यासाठी ३० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली.

