Mumbai–Goa Highway : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना कोकणकरांची गावी जायची लगबग सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणात चाकरमाणी गावी लोटतात. त्यामुळे कोकणातील महामार्गावर अनेक समस्या निर्माण होतात.प्रवाशांचा हेणारी गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने मुंबई -गोवा महामार्गावर नियोजन केले आहे. त्यामुळे कोकण मार्गावर आता योग्य सुविधा उपलब्ध असणार आहेत.

शांतता समितीची बैठक
जिल्हा नियोजन भवन येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक आचल दलाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज
गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात सात पोलिस उपनिरीक्षक, १२८ पोलिस अधिकारी, १,९०० पोलिस अंमलदार, गृहरक्षकदलाचे चारशे जवान आणि एसआरपीएफची एक कंपनी तैनात करण्यात येणार आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी २५ मोटरसायकली, २० टोइंग क्रेन आणि २० रुग्णवाहिका सज्ज असतील.
महिला व बालकांसाठी सुविधा
खारपाडा, खारेपाटण, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड, महाड एमआयडीसी आणि पोलादपूर येथे सुविधा केंद्रे उभारली जाणार आहेत. या केंद्रांवर पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, पोलिस मदत कक्ष, महिला व बालकांसाठी सुविधा आणि वाहनांसाठी आवश्यक सेवा उपलब्ध असतील.
समिती सदस्यांना ओळखपत्र
‘आत्तापर्यंत ३६ शांतता समिती, ३० मोहल्ला समिती, १३७ गणेश मंडळे आणि १२५ गावबैठकाघेण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. शांतता समिती सदस्यांची पोलिस पडताळणी पूर्ण करून त्यांना ओळखपत्रे द्यावीत, तसेच स्थानिक खासगी बचाव पथकाशी समन्वय साधावा’, असे निर्देशही गोगावले यांनी दिले.
दिवस सरले, आकडे फिरले! आज निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात ‘उलटा’ निकाल; काय सांगतो सर्व्हे?
महामार्गावरील खड्डे बुजवा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई- गोवा महामार्गावरील खड्डे आणि अन्य अडचणीत तातडीने दूर करण्याच्या सूचना गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. पनवेल- पळस्पे येथून माणगावपर्यंत महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी निर्माण होते. त्यामुळे गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी कामे वेगाने पूर्ण करावीत असे आदेश त्यांनी दिले.

