Headlines

ऐन गणेश चतुर्थीला चाकरमान्यांचे हाल! मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे; आता सरकार, प्रशासनाला जाग, कधीपर्यंत काम होणार?


Ratnagiri News: कोकणात आता सणांची लगबग सुरू झालेली असताना मुंबई गोवा महामार्गाची मात्र चांगलीच अवस्था झाल्याच चित्र पहायला मिळतय .अशातच कोकणासह राज्यातील बॅल्क स्पॉट निश्चित केले गेलेत.यामध्ये मुंबई गोवा महामार्गावर एकूण २० ब्लॅक स्पॉट तर पळस्पे ते पोलादपूर १७ ब्लॅक स्पॉट रत्नागिरी जिल्ह्यात २ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ब्लॅक स्पॉट,राष्ट्रीय महामार्गावर ५७३ तर अन्य महामार्गावर १२५ ब्लॅक स्पॉट महामार्ग पोलीस व राज्य पोलिस वाहतूक विभागाने निश्चित केले .

ब्लॅक स्पॉट
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
प्रसाद रानडे,रत्नागिरी : कोकणात आता गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आला आहे. गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे अशातच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ावरील ब्लॅक स्पॉट राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी निश्चित केले आहेत. गेली सुमारे 18 वर्षे चाललेल्या या महामार्गाची धोकादायक ठिकाणांची रडकथा अद्यापही संपलेली नाही. राज्यभरातील ही ठिकाणी निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यात पोलादपूर पासून पळस्पे पासून पोलादपूर या 150 किलोमीटरच्या मार्गात एकूण 17 ब्लॅक स्पॉट आहेत.

रत्नागिरी ,सिंधुदुर्ग जिल्ह्यात ब्लॅक स्पॉट निश्चित

रत्नागिरी जिल्ह्यात खेड भोस्ते ,हातखंबा गाव ही 2 दोन ठिकाण ब्लॅक स्पॉट आहेत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली जानवली हॉटेल येथे 1 ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर एकूण 20 ठिकाणी ब्लॅक स्पॉट म्हणजेच अपघातांची धोक्याची ठिकाणे आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बांधकाम विभाग तातडीने या ठिकाणांची दुरुस्ती कायमस्वरूपी उपाययोजना कधी करणार असा खडा सवाल आता वाहन चालक, प्रवासी वर्गाकडून विचारला जात आहे.

रायगड जिल्ह्यातील बॅल्क स्पॉट

रायगड जिल्ह्यात पोलादपूर ते पळस्पे फाटेपर्यंतच्या ब्लॅक स्पॉटची नावे – पेण , तरणखोप, रामवाडी, वाशी फाटा, वडखळ, डोलवी नागोठणे; सुकेळी खिंड, शेठ पळस, गोरेगाव रेपोली,लोणेरे, टेम्पाले, तळेगाव पेट्रोल पंप माणगाव,कशेणे महाड टेमपाले ते लाख पाले, लाख पाले ते पहेल, वीरपोलादपूर, चोळई, धामणदेवी, लोहारे, पार्ले गाव ही ब्लॅक स्पॉट म्हणजेच धोकादायक ठिकाणी आहेत.

अपघातांची ठिकाणी निश्चित करून ब्लॉक स्पॉट निश्चित केले आहेत

राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी कोकणासह महाराष्ट्र राज्यातील मुख्य महामार्गावर असलेली अपघातांची ठिकाणी निश्चित करून ब्लॉक स्पॉट निश्चित केले आहेत. त्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन उपाययोजना केली जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर 573 ठिकाणांचा समावेश असून अन्य मार्गांवरती एकूण 125 ठिकाणी ब्लॅक स्पॉट यादी राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी तयार केली आहे.क्षित व्हावा यासाठी राज्य पोलीस व महामार्ग पोलीस, राज्य वाहतूक विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.

Maharashtra TimesBeed News: परळीत होणार पशुवैद्यक महाविद्यालय; पार पडले भूमिपूजन, महाविद्यालयाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच नाव देण्याची मागणी

राष्ट्रीय महामार्ग (NH) बॅल्क स्पॉट

यामध्ये राज्यातील अहिल्यानगर 37, बीड 29 , भंडारा 6, छत्रपती संभाजी नगर 24, चंद्रपूर 7, धाराशिव धुळे 44, गोंदिया 19, हिंगोली 16, जालना 11, कोल्हापूर 18, नागपूर ग्रामीण 14, नांदेड 28, नंदुरबार 12, नाशिक ग्रामीण 55, पालघर 14, परभणी 6, पुणे ग्रामीण 7, रायगड 28, रत्नागिरी 3, सांगली 6 , सातारा 6, सिंधुदुर्ग 1, सोलापूर ग्रामीण 12, ठाणे ग्रामीण 15, वर्धा 15, वाशिम 1, यवतमाळ 7

राज्य महामार्ग ब्लॅक स्पॉट

अमरावती ग्रामीण 13, बीड 11, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 8, चंद्रपूर 1, धुळे 19, गोंदिया 1, हिंगोली 9, कोल्हापूर 9, नांदेड 2, नंदुरबार 4, नाशिक ग्रामीण 22, पालघर 1,सांगली 2 , वर्धा 4

Maharashtra TimesMaharashtra Weather Alert : महाराष्ट्रात हवा बदलली! कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान खात्याचा ताजा अंदाज

अन्य राज्यमार्ग ,राज्य महामार्ग ( एमडीआर)

हिंगोली 3, कोल्हापूर 11, नाशिक ग्रामीण 2,

अमरावती ग्रामीण 1, धुळे 4,एक्सप्रेस वे
भंडारा 1, रायगड जिल्ह्यात 17 ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहेत

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा