नाशिकमधील खड्ड्यांवरून सध्या जोरदार राजकारण पेटलेलं दिसतंय. उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुद्धा प्रचंड आक्रमक झाली असून नाशिक महानगरपालिकेवर संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी राऊतांनी आपल्या भाषणातून भाजप, शिंदेसेने आणि विशेषतः मंत्री गिरीश महाजन यांना खडेबोल सुनावले आहेत.