Headlines

Woman harassment twice on private bus while travelling from Goa to Mumbai; धावत्या बसमध्ये महिलेसोबत संतापजनक प्रकार; आधी उठवण्याच्या बहाण्याने स्पर्श, नंतर पुन्हा दुष्कृत्य


रत्नागिरी: महिलांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कितपत सुरक्षित आहे, याबाबत वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत असते. अशातच एका खासगी बसमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेनं हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खाजगी ट्रॅव्हल्समधून गोव्यावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करताना एका महिला प्रवाशाचा दोनवेळा विनयभंग झाल्याची तक्रार दाखल करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील कोलाड पोलीस ठाणे इथं एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे की, खाजगी बस राजधानी ट्रॅव्हल्स (एमएच ४३ सीके 2981) मधून गोवा ते मुंबई असा प्रवास करत असताना संगमेश्वर या ठिकाणी आल्यानंतर बस थांबली होती. तेव्हा बसमधील क्लिनरने महिलेला उठवण्याचा बहाणा करून स्पर्श केला. त्यावेळी क्लिनरकडून चुकून स्पर्श झाल्याचं समजून सदर महिला शांत राहिली. मात्र पुढे आल्यानंतर पोलादपूरजवळ देखील क्लिनरने तिचा विनयभंग केला. या प्रकारानंतर सदर महिलेने पोलीस कंट्रोल रूमला संपर्क साधला आणि त्यानंतर बस थेट कोलाड पोलीस ठाणे इथं नेण्यात आली.

पीडित महिलेने कोलाड पोलीस ठाणे येथे तिच्यासोबत घडलेली सर्व हकीकत पोलिसाना सांगितली. महिलेच्या तक्रारीवरून आरोपी क्लिनरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा हा संगमेश्वर पोलीस ठाणे या हद्दीमध्ये घडलेला असल्याने पुढील तपासासाठी गुन्हा संगमेश्वर पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आला आहे.

अंबादास दानवेंचा संताप

ही घटना उघडकीस आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला आहे. “गोव्याहून मुंबईकडे जात असलेल्या राजधानी ट्रॅव्हल्सच्या एमएच-४३-सिके-२९८१ क्रमांकाच्या बसमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या एका महिला प्रवाशाला रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास बसच्या स्टाफकडूनच त्रास दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या या मुजोर स्टाफला धडा शिकवण्यासाठी संबंधित बस आता कोलाड (जि. रायगड) पोलिस ठाण्यात वळवण्यात आली आहे. ‘लाडकी बहीण’ म्हणणे केवळ घोषणांपुरते मर्यादित राहू नये, या महिलेच्या पाठीशी सरकार आणि पोलिस ठामपणे उभे आहेत, हे कृतीतून दाखवून द्यावं. या प्रकरणात महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. अन्यथा गाठ आमच्याशी आहे,” असा इशारा दानवे यांनी दिला आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत