Headlines

Tough Fight Between BJP And Eknath Shinde Shiv Sena in 3 Municipal Council Elections of Dhule Districts


धुळे जिल्ह्यात एकूण 4 ठिकाणी यावेळी निवडणूक पार पडत आहे. यापैकी दोंडाईचा वरवाडी नगर परिषदेत भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. कारण इथे भाजपच्या सर्व नगरसेवकांसह नगराध्यक्षांची बिनविरोध निवड झाली आहे. तर इतर तीन ठिकाणी शिवसेना आणि भाजप यांच्यात काँटे की टक्कर बघायला मिळत आहे. दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा यामध्ये पणाला लागलेली बघायला मिळत आहे.

Eknath Shinde And Devendra Fadnavis
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अजय गर्दे, धुळे : राज्यभरात नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. धुळे जिल्ह्यातही तीन नगर परिषद आणि एक नगर पंचायतीची निवडणूक पार पडत आहे. यापैकी तीन ठिकाणी महायुतीत बिघाडी झालेली बघायला मिळत आहे. या तीनही ठिकाणी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढताना दिसत आहे. तर दोंडाईचा वरवाडे नगर परिषद निवडणूक ही बिनविरोध ठरली आहे. इथे भाजपचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांचीदेखील बिनविरोध निवड झाली आहे. धुळ्यातील प्रत्येक नगर परिषद आणि नगर पंचायतमधील सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शिरपूरमध्ये अमरिश पटेल यांची प्रतिष्ठा पणाला

शिरपूर तालुक्यात वरवाडे नगर परिषदेत माजी मंत्री अमरीश पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत त्यांचे पुतणे चिंतन भाई पटेल हे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हेमंत पाटील यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळालेली आहे. विशेष म्हणजे हेमंत पाटील हे काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. ते अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय होते. शिरपूरच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे गट अशी थेट लढत बघायला मिळत आहे.
Maharashtra TimesNandurbar Elections : AIMIM आणि NCP पक्षांमुळे राजकीय गणितं बदलणार? शहादाच्या निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट
शिंदे गटाचे हेमंत पाटील हे पूर्वी भाजपमध्ये होते. गेल्या निवडणुकीच्या वेळी भाजपने त्यांना एबी फॉर्म दिला नव्हता. त्यामुळे ते नाराज होते. त्याबाबत त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. दरम्यान, त्यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांनी ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी शिवसेनेचे धुळे जिल्हाप्रमुख सतीश तात्या महाले यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या विजयासाठी शिरपूरमध्ये बुधवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात प्रचारसभा पार पडली होती. या प्रचारसभेत मंत्री दादा भुसे, साक्री विधानसभेच्या आमदार मंजुळा गावित सहभागी होत्या. दरम्यान, भाजपकडून या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या भागात सभा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल : 16 वॉर्ड 32 नगरसेवक; काँग्रेस 21, भाजप 4, अपक्ष 5.

दोंडाईमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय, सर्वांची बिनविरोध निवड

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद निवडणूक ही बिनविरोध ठरली आहे. या ठिकाणी भाजपचे सर्व 26 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार शरयू भावसार यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. पण त्यांचा उमेदवारी अर्ज हा तांत्रिक कारणांमुळे बाद ठरला. यामुळे समोर कुणीच विरोधक नसल्यामुळे नयन कुंवर रावल यांची बिनविरोध नगराध्यक्षा म्हणून निवड झाली आहे. यावेळी त्या चौथ्यांदा दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षा बनल्या आहेत.
गेल्या निवडणुकीत पक्षीय बल : वॉर्ड 13, 26 नगरसेवक; भाजपा 20, काँग्रेस 3, मनसे 1

पिंपळनेर नगर परिषदेत पहिल्यांदाच निवडणूक

पिंपळनेर नगर परिषदेत पहिल्यांदाच निवडणूक पार पडत आहे. या ठिकाणी एकूण 20 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत देखील महायुतीत बिघाडी झाली आहे. या ठिकाणी भाजप, शिंदे गट आणि काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पण खरी फाईट ही भाजप विरुद्ध शिंदे गट अशीच आहे. या निवडणुकीत शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पिंपळनेरमध्ये भाजपकडून योगिता चौरे, शिवसेनेकडून ललिता गायकवाड आणि काँग्रेसकडून प्रतिभा चौरे देशमुख हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. या तीनही उमेदवारांमध्ये कोण विजयी होतं? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.
Maharashtra Times‘मी कुणाच्या टक्केवारीवर जगणारा नाही’, आधी निलेश राणेंची धाड, आता भाजपचे विजय केनवडेकर यांचं प्रत्युत्तर

शिंदखेडा नगर पंचायतीत चौरंगी लढत

शिंदखेडा तालुक्यातील शिंदखेडा नगर पंचायत निवडणुकीत यावेळी चौरंगी लढत बघायला मिळत आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा चार पक्षांमध्ये ही लढत आहे. यापैकी तीन पक्ष हे राज्यात सत्तेत आहेत. पण ते स्वतंत्र निवडणूक लढवताना दिसत आहेत. या ठिकाणी भाजपचे माजी मंत्री जयकुमार रावल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या नगर पंचायतीत भाजपकडून रजनी वानखेडे, शिवसेनेकडून मनीषा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कलावती माळी आणि काँग्रेसकडून विजया चौधरी हे चार उमेदवार नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार आहेत.
गेल्या निवडणुकीत पक्षीय बल : 17 वॉर्ड, 17 नगरसेवक; भाजप 10, काँग्रेस 5, समाजवादी 2

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा