छत्रपती संभाजीनगर येथील ॲड. श्रीकांत मिश्रा हे कुटुंबीयांसह कारने (एमएच २० जीके ०२०२) मुंबईकडे जात होते. रात्री पावणेबाराच्या सुमारास त्यांच्या कारच्या टायरला लोखंडी वस्तू आदळल्याने टायर फुटले. मिश्रा यांनी प्रसंगावधान राखत वाहनाचा वेग कमी करून कार थांबवली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या १० ते १२ जणांच्या टोळीने कारला घेरले.
Nashik News: आधी गिरीश महाजनांचा टोमणा, नंतर भुजबळांनीकडून सव्याज परतफेड; मुख्यमंत्र्यांसमोरच दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार टोलेबाजीदरोडेखोरांनी लोखंडी रॉड आणि दांडक्यांनी मिश्रा यांना मारहाण केली. तसेच कारमधील लहान मुलांना बाहेर खेचण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी सोन्याचे दागिने, घड्याळे आणि रोख ८४ हजार ५०० रुपये, असा एकूण १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज दरोडेखोरांच्या स्वाधीन केला.
घटनेची माहिती मिळताच डायल ११२, क्यूआरव्ही पथक, महामार्ग पोलिस आणि वावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक तुषार गरुड, हवालदार प्रवीण गुंजाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. मध्यरात्री जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, निफाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी के. के. पाटील, सिन्नरचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार आणि एमआयडीसीचे सुनील बडगुजर यांनीही घटनास्थळी भेट दिली.
याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक आशीष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथके संशयितांचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू आहे.
Surgana Crime: मध्यरात्री साधला डाव, सुरगाण्यात वृद्ध दाम्पत्याला निर्घृणपणे संपवलं, नातवासह नातसून पोलिसांच्या ताब्यातव्यावसायिकाकडून स्वसंरक्षणार्थ गोळीबाराची चर्चा
पहिल्या घटनेनंतर मध्यरात्री सुमारे १.४० वाजता मुंबईहून नांदेडकडे जाणाऱ्या मोहम्मद फरान (वय ३०) यांच्या कारचे (एमएच १२ टीके ५८२३) टायरही धारदार वस्तू टाकून फोडण्यात आल्याचे सांगितले जाते. कार थांबताच चार ते पाच जणांनी चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दरोडेखोर हे फरान यांच्या दिशेने धावल्याने त्यांनी परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून हवेत दोन राउंड फायर केल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांनी गोळीबाराच्या घटनेला दुजोरा दिलेला नाही.
अन्य वाहनेही लक्ष्य
या टोळीने महामार्गावरील आणखी दोन वाहनांनाही अशाच पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. टायर पंक्चर करून वाहन थांबवायचे आणि त्यानंतर प्रवाशांना घेरून लुटायचे, अशी दरोडेखोरांची पद्धत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
Shiv Sena vs BJP : शिवसेनेकडील खात्यांमध्ये CMO ची ढवळाढवळ, मंत्र्यांची शिंदेंकडे जाहीर नाराजी, रिक्षाचालकांच्या मराठीला मुदतवाढ मिळताच कडेलोटबंदूक जवळ होती म्हणून बचावलो…
समृद्धी महामार्गावरील लुटीच्या प्रयत्नातून नांदेडचे व्यावसायिक मोहम्मद फरान (वय ३०) कुटुंबासह थोडक्यात बचावले. मध्यरात्री सुमारे १.४० वाजता ते पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, पाच वर्षांचा मुलगा आणि चालकासह कारने (एमएच १२ टीके ५८२३) मुंबईहून नांदेडकडे जात होते. अचानक टायर फुटल्याचा आवाज झाल्याने त्यांनी सुमारे एक किलोमीटर पुढे जाऊन कार थांबवली.
चालक टायर बदलत असताना अंधारातून चार ते पाच जण धारदार शस्त्रे घेऊन कारकडे धावत आले. त्यांनी चालकाला धक्काबुक्की व मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पुढचा निशाणा कुटुंब असू शकते, हे लक्षात येताच फरान यांनी कमरेला असलेल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून हवेत दोन गोळ्या झाडल्याचे सांगितले. गोळीबाराचा आवाज होताच दरोडेखोर महामार्गावरून खाली उतरून अंधारात पसार झाले. काही वेळात महामार्ग पोलिस घटनास्थळी पोहोचले. फरान हे नांदेड येथील फोर्ड कारचे डीलर आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने गेल्या दोन वर्षात तब्बल ७० हजार किमी प्रवास समृद्धी महामार्गावरून केल्याचे ते सांगतात. त्यामुळे हा मार्ग त्यांच्यासाठी नवा नाही. मात्र, कुटुंबासह आलेला हा अनुभव त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करणारा ठरला.
घटनेचे गांभीर्य सांगताना फरान म्हणाले, ‘माझ्याकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर होती, म्हणून त्या क्षणी स्वसंरक्षणासाठी गोळीबार करता आला. माझ्या जागी अन्य कोणी असते आणि त्याच्याकडे कोणतेही संरक्षणाचे साधन नसते, तर त्या कुटुंबाच्या जीवाचे काय झाले असते, याचा विचारही करवत नाही.’ ‘कुटुंब सुरक्षितपणे प्रवास करू शकेल, अशी हमी या महामार्गावर कधी मिळणार?’ असा सवालही फरान यांनी उपस्थित केला.

