Thane Joshi Couple Missing : कितीतरी मेसेज पाठवले तरी सिंगल ‘टिक’ येतेय… फोन कुठे असेल? चार्ज नसेल झालेला का? नेटवर्क नसेल का? काहीच कळत नाही… मुंबईच्या ग्रुपसोबत गेलेल्यांपैकी कुणाशीही संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांची घालमेल सुरु आहे
समीर आणि अपर्णा जोशी, ठाणे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : कितीतरी मेसेज पाठवले तरी एकच ‘टिक’ येतेय… फोन कुठे असेल? चार्ज झालेला नसेल का? नेटवर्क नसेल का? काहीच कळत नाही… मुंबईच्या गटासोबत गेलेल्यांपैकी कुणाशीही संपर्क होत नाहीये… नेपाळमधील पुरानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांच्या नातेवाईकांची अशीच घालमेल सुरू आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत ८५ भारतीयांची सुटका झाल्याची माहिती मिळाली असली, तरी महाराष्ट्रातील, त्यातही प्रामुख्याने मुंबई, पुण्याच्या एका गटातील पर्यटकांबाबत अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. त्यामुळे एखादा तरी फोन येईल, कुठूनतरी काहीतरी कळेल, या आशेवर नातेवाईक आहेत. ठाण्यातील समीर जोशी व अपर्णा जोशी यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय हवालदिल झाले आहेत.
आप्तांच्या वाटेकडे कुटुंबीयांचे डोळे
आपल्या बेपत्ता नातेवाईकांची माहिती मिळेल, या आशेने त्यांनी दोन दिवसांमध्ये भारतातील संपर्क क्रमांकांपासून नेपाळ, चीन येथील मिळालेल्या प्रत्येक नंबरवर कित्येकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. अद्याप संपर्क न झालेल्या या गटातील रजनीश नातू यांच्या घरीही सध्या हीच स्थिती असल्याचे त्यांच्या एका स्नेह्यांनी सांगितले. कुठल्या तरी वृत्तवाहिनीवर बेपत्तांबाबत माहिती मिळेल, यासाठी सतत टीव्ही वाहिन्या बदलत, वेबसाइट तपासत ते फोनकडे डोळे लावून बसले आहेत.
ठाण्याचे सतीश पाटणकर आणि त्यांच्या पत्नी रेखा पाटणकर यांचाही अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. त्यांच्या भगिनी, मुले परदेशात असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील नातेवाईकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीकडे ते नजर लावून बसले आहेत.
अंधेरीतील डॉ. आनंद देशपांडे आणि त्यांच्या पत्नी डॉ. गायत्री देशपांडे नेपाळमध्ये अडकले आहेत. डॉ. आनंद देशपांडे हे हिंदुजा रुग्णालयात रक्त संक्रमण शास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. तर डॉ. गायत्री देशपांडे या नानावटी रुग्णालयाच्या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रतज्ज्ञ असल्याची माहिती रुग्णालयातील त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे.
माहिती मिळवण्यासाठी मदतीचे आवाहन
ठाण्यातील समीर जोशी व अपर्णा जोशी यांच्याशी दोन दिवसांपासून संपर्क होत नाही. त्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करून, त्यांच्याबद्दल माहिती मिळाल्यास कळवण्याचे आवाहन त्यांच्या स्नेह्यांनी केले आहे. जोशी हे ‘रिचा ट्रॅव्हल्स’ सोबत कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले आहेत. ज्यांनी त्यांना पाहिले असेल, सोबत प्रवास केला असेल, त्याच सुमारास सीमा ओलांडली असेल, अशा व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
एक गट आज नेपाळमध्ये परतणार
मुंबईहून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या मैत्री ग्रुप्सचे ६८ ते ७० पर्यटक यात्रेकरू शनिवारी तिबेटमधून नेपाळमध्ये पुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. दुर्घटना घडली, तेव्हा त्यांचा गट यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात होता. मात्र आपत्तीमुळे परतीचे मार्ग बंद झाले. आता नेपाळ आणि चीनने कोदारी सीमामार्ग सुरू केल्याने या मार्गाने सुखरूप असलेले पर्यटक परत येतील.
प्रलयाच्या कारणांचा शोध सुरू
नेपाळमध्ये अचानक आलेल्या विनाशकारी पुरातून काही धडे मिळाले आहेत. मुख्यत्वे, हिमालयाच्या प्रदेशातील धोके समजून घेऊन ते कमी करण्यासाठी आणि भू-वापर धोरण विकसित करण्यासाठी हिमनद्यांचे पद्धतशीर व वैज्ञानिक मूल्यांकन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. ‘या दुर्घटनेमागे हवामान बदलाशी संबंधित कारण आहे. बर्फाचे आच्छादन कमी होत आहे, हिमनद्या आटत आहेत. परिणामी, खडकाळ किंवा ओसाड भाग समोर येत आहेत. ते अधिक उष्णता शोषून घेतात. त्यामुळे उतार अधिक असुरक्षित बनत आहेत,’ असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा