Ratnagiri Dahivali Landslide Incident Vijay Shelar : रत्नागिरीतील खेड तालुक्यामधील दहिवली येथे दरड कोसळून वडील आणि मुलाचा करुण अंत झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मोठ्या दुर्घटनेचे पहिले साक्षीदार
हा सगळा प्रकार ज्यांच्यामुळे उघडकीस आला ते म्हणजे विजय शेलार. प्रसंगावधान राखत त्यांनी आणखी दोघांना घरातून बाहेर काढल्यानं दोघांचा जीव वाचवला. त्यांनी स्वतःचा देखील 20 फूट खाली उडी मारून जीव वाचवला. त्या विजय शेलार यांची कामगिरी धाडसी ठरली आहे. अन्यथा आणखी मोठा अनर्थ घडला असता. शेलार हे एका दिवसासाठी मुंबईहून गावी आलेले होते. ते या मोठ्या दुर्घटनेचे पहिले साक्षीदार ठरले असून त्यांच्यामुळेच या सगळ्या भयंकर दुर्घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थ व प्रशासनापर्यंत पोहोचली व तात्काळ मदतकार्य सुरू झालं. त्यामुळे या दुर्घटनेत त्यांनी केलेली कामगिरी जणू देवदूताची ठरली आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.
Pune News : ताईला सांगत होतो इथे काम नको करुस… बहीण ढिगाऱ्याखाली अडकली, भावाचा हंबरडा; मोशी इमारत दुर्घटनेनंतर उपस्थित हेलावले
कोण आहेत विजय शेलार?
विजय सहदेव शेलार हे मूळचे याच दहिवली गुडूब वाडीतील आहेत. ते आपल्या नोकरी/व्यवसायानिमित्त मुंबई घाटकोपर येथे स्थायिक आहेत. ते घाटकोपर येथे रिक्षाचालक आहेत. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत दाखवलेल्या धाडसाचं कौतुक सर्वत्र होत आहे. विजय शेलार हे खेड तालुक्यातील तळे येथील भावाच्या सासर्याचं निधन झालं त्या कार्यासाठी मुंबईहून गावी आले होते. सोमवारी सायंकाळी खेड येथे ट्रेन उशिरा आल्यानं त्यांना गावी दहिवली येथे पोहोचण्यास संध्याकाळी सुमारे साडेसात ते आठ वाजले.
VIDEO | खेडमध्ये दरड कोसळून मृत्यू,दुर्घटनेला जबाबदार कोण?
जेवणासाठी वाट पाहत होते
शेलार मुंबईहून घरी येणार म्हणून कुटुंब त्यांची जेवणासाठी वाट पाहत जागे होते. रात्री जेवणानंतर ते साडेनऊच्या दरम्यान सहज बाहेर आले. त्यावेळी शेजारच्या चुलत्यांची दोन घरं दरडखीला गेल्यामुळे दिसतच नव्हती. हा प्रकार पाहून त्यांचेही पायाखालची जमीन सरकली. पण त्याही परिस्थितीत प्रसंगावधान राखत विजय यांनी शेजारच्या घरात राहणारे केशव शेलार व मुक्ताबाई शेलार या दोघांना तत्काळ बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले. याचदरम्यान ज्यांना बाहेर काढलं त्याही घरावर मोठे झाड कोसळलं. पण दैव बलवत्तर म्हणून विजय शेलार यांनी तब्बल 20 फूट खाली उडी मारल्याने ते सुदैवाने स्वतःचा जीवही वाचऊ शकले, अशी माहिती दहिवली येथील राजेंद्र शेलार यांनी दिली.
Hingoli Earthquake : हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के; दोन तासात चार वेळा धरणीकंपाची पहिलीच वेळ
याआधी शासनाला याची माहिती दिलेली
‘विजय शेलार यांच्यामुळेच हा घडलेला प्रसंग गावातील सरपंच, पोलीस पाटील, महसूल व पोलीस प्रशासन आम्हाला सगळ्यांना कळला अन्यथा ही दुर्घटना आम्हाला कदाचित दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत कळलीच नसती’, अशी प्रतिक्रिया राजेंद्र शेलार यांनी दिली. राजेंद्र शेलार यांचेही घर या दुर्घटनेत घरात पाणी शिरल्याने पूर्णपणे बाधित झालं आहे. ‘गुडुबवाडी व गोलामवाडीत अशी काही आपत्ती दुर्घटना घडण्याची भीती आम्हाला पूर्वीपासून होती. त्यामुळे आपण स्वतः शासनाकडे 2017 पासून पत्र व्यवहारी केले आहेत. आमच्या गावात यापूर्वी जमीनींना भेगा जाण्याचे प्रकार घडले होते. मात्र, त्याकडे शासनाकडून गांभीर्याने पाहिलं गेलं नाही त्यामुळे आज ही परिस्थिती ओढवली’, अशी खंत त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ जवळ बोलताना व्यक्त केली.

