#ramdasathwale #rpi #parlimentmp #prakashambedkar #bjpमी राज्यसभेवर जाणार हे मला माहीत होते भाजपने राज्यसभा उमेदवारीसाठी रामदास आठवले यांचे नाव निश्चित केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे महाविकास आघाडीमध्ये जर काही बिघाडी झाली तर सातवी जागा देखील आम्ही जिंकू रिपब्लिकन पार्टीच्या सर्व गटांनी एकत्र यावे आणि प्रकाश आंबेडकरांनी त्याचे नेतृत्व केल्यानंतर आमच्या समाजाची ताकद वाढेल आणि आमच्या समाजाला प्रतिनिधित्व मिळेल असे वक्तव्य देखील रामदास आठवले यांनी केला आहे त्यांनी परभणी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले आहे. यासोबतच समाजातील युवकांना उद्योग देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि माझ्या खात्यामार्फत हे उद्योग दिले जातील तर भारतातील गरिबी संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयत्नशील असून लवकरच भारतातील गरिबी संपेल असा विश्वास देखील रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे