Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे मुठा नदीला पूर येऊन बुधवारी भिडे पूल पाण्याखाली गेला.

बुधवारी पहाटे विसर्ग २७ हजार २०३ क्युसेक करण्यात आल्याने मुठा नदीला पूर आला. त्यामुळे नदीकाठलगतच्या रहिवासी भागात पाणी शिरले. पुरामुळे भिडे पूलही पाण्याखाली गेला. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी झाली होती.
Pune Rain Updates: पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या किल्ल्यांसह प्रसिद्ध धबधब्यांवर पर्यटकांना बंदी; कधीपर्यंत राहणार निर्बंध?
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरण साखळी प्रकल्पात एक जुलै महिन्यापासून जोरदार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांमध्ये मिळून १४.९५ अब्ज घनफूट (टीएमसी) अर्थात ५१.३० टक्के पाणीसाठा झाल्याने पाणीकपातीला तोंड देणाऱ्या शहराला दिलासा मिळाला आहे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे जून महिना कोरडा गेल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरतील का, हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, मागील आठ दिवसांतील दमदार पावसामुळे पुणेकरांची किमान आठ महिन्यांची चिंता मिटली आहे.
धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सांडव्यावरून मुठा नदीपात्रात मंगळवारी ८०८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. मंगळवारी रात्री बारा वाजता ८४२, एक वाजता एक हजार ६८४, दीड वाजता तीन हजार ४२४, अडीच वाजता सहा हजार ६३४ क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. सव्वा तीन वाजता सुरू असलेला १४ हजार ३९३ क्युसेकचा विसर्ग पहाटे साडेपाच वाजता २७ हजार २०३ क्युसेक करण्यात आला. दुपारी साडेबारा वाजता १८ हजार २७१ क्युसेक, तर रात्री आठ वाजता विसर्ग १५ हजार १५७ क्युसेक करण्यात आला. हा विसर्ग रात्री १०.३० वाजता पूर्ण बंद करण्यात आला.
Pune News : ताईला सांगत होतो इथे काम नको करुस… बहीण ढिगाऱ्याखाली अडकली, भावाचा हंबरडा; मोशी इमारत दुर्घटनेनंतर उपस्थित हेलावले
पाणीसाठा १४.९५ वर
धरणसाखळीतील पाणीसाठ्यात २४ तासांत २.७४ टीएमसीने वाढ झाल्याने पाणीसाठा १४.९५ टीएमसीवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी पाणीसाठा १९.५५ टीएमसी होता. आत्तापर्यंत खडकवासल्यात ४१७, पानशेत येथे ९७२, वरसगाव येथे ९४७ तर, टेमघर येथे १ हजार १४५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
Moshi Building Collapse: मोशीत मोठी दुर्घटना! कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला; 7 जणांची सुटका, 11 कामगार अजूनही ढिगाऱ्याखालीच
चार धरणे काठोकाठ
भीमा खोऱ्याअंतर्गत जिल्ह्यातील २७ धरणांपैकी खडकवासल्यासह वडज, कळमोडी आणि कासारसाई ही धरणे शंभर टक्के भरल्याने विसर्ग सुरू करून पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यात येत आहे. येडगाव, चिल्हेवाडी, चासकमान, भामा-आसखेड, वडीवळे, आंद्रा, पवना, मुळशी, गुंजवणी, नीरा-देवघर, वीर ही धरणे ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. वडज धरणातून १४ हजार, चिल्हेवाडी धरणातून तीन हजार १३, कळमोडीतून पाच हजार ४५९, वडिवळे धरणातून एक हजार १२३, कासारसाई धरणातून तीन हजार २७ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

