वर्धा चिमुरडी अत्याचार प्रकरण:खटला जलदगती न्यायालयात चालणार; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश
वर्धा तालुक्यातील रोठा येथे १२ वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्यंत संतापजनक अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या खटल्याची सुनावणी तातडीने जलदगती न्यायालयात घेण्याचे महत्त्वाचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून सुप्रसिद्ध सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात…
