Navi Mumbai 28 year old pratik raskar from pune jumped into sea from atal bridge still missing; पुण्यातील 28 वर्षीय प्रतिक कारने मुंबईकडे आला; पण अटल सेतूवरून स्वत:ला झोकून दिलं
Navi Mumbai 28 year old pratik raskar from pune jumped into sea from atal bridge still missing; पुण्यातील 28 वर्षीय प्रतिक कारने मुंबईकडे आला; पण अटल सेतूवरून स्वत:ला झोकून दिलं
अमुलकुमार जैन, नवी मुंबई: अटल सेतू मार्गावरील पुलावरून एका 28 वर्षीय तरुणाने समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आणि संबंधित बचाव यंत्रणांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली असून, सोमवारी सकाळपर्यंत तरुणाचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नव्हता.
उलवे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, प्रतिक सुभाष रासकर (वय 28) या तरुणाने रविवारी पहाटे 1.29 वाजण्याच्या सुमारास अटल सेतूवरून समुद्रात उडी मारल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर क्रमांक 48/2026 अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
शेअर मार्केटचे क्लासेस, पुणे जिल्ह्यातील रहिवासी
प्रतिक रासकर हा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रहिवासी असून, तो शेअर मार्केट क्लासेसशी संबंधित व्यवसाय करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेपूर्वी त्याने कुटुंबीयांना बाहेर जेवणासाठी जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तो घरातून बाहेर पडला. पुढे त्याने आपली कार अटल सेतूवर उभी केल्यानंतर समुद्रात उडी मारल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली.
हरवलेल्या प्रतिक रासकर याचे वर्णन गोरा रंग, मजबूत शरीरयष्टी, अंदाजे 5 फूट 10 इंच उंची, काळे केस, काळे डोळे, तसेच वाढलेली दाढी-मिशी असे आहे. घटनेच्या वेळी त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि ग्रे रंगाची पॅन्ट परिधान केली होती. घटनेची माहिती मिळताच उलवे पोलिसांनी सागरी सुरक्षा यंत्रणा आणि बचाव पथकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. समुद्र परिसरात तसेच किनारपट्टी भागात शोधकार्य सुरू असून अद्याप कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही.
दरम्यान, या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिक रासकर याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने उलवे पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा