Mumbai Building Collapse: शहरातील काही भागांत मोठ्या प्रमाणात झोपड्या आणि चाळी असून, अनेक ठिकाणी दुमजली-तीन मजली घरे उभारण्यात आली आहेत. या घरांची पडझडही मोठ्या प्रमाणात होत आहे.

गेल्या पाच वर्षांत घर, घराचा भाग किंवा इमारतींचा भाग कोसळण्याच्या १,१७५ घटना घडल्याचे महापालिकेच्या आकडेवारीतून समोर आले आहे. २०२१मध्ये घर कोसळण्याच्या २३४ घटना घडल्या होत्या. त्यात ७५ जण जखमी झाले, तर २२ जणांचा मृत्यू झाला.
E Challan : वाहतूक नियम मोडल्याचं चालान आल्यास घाई करा, हरकतीस केवळ 45 दिवसांची मुदत, दुर्लक्ष केल्यास दंड अनिवार्य२०२२मध्ये २३२ घटना घडल्या. त्यात ७३ जण जखमी झाले, तर २५ जणांचा मृत्यू झाला. २०२३मध्ये घटनांची संख्या २३२ होती आणि यामध्ये मृतांची संख्या आठ होती. २०२४मध्ये घर कोसळण्याच्या घटना वाढून २६६ झाल्या. या दुर्घटनांमध्ये ७५ जण जखमी झाले, तर १४ जणांचा मृत्यू झाला. २०२५मध्ये २११ घटनांची नोंद झाली. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. चालू वर्षात ७ जुलैपर्यंत अशा ६०९ घटना घडल्या आहेत.
वृक्ष कोसळून एकूण ११ जणांचा मृत्यू
२०२१ ते जुलै २०२६ या कालावधीत झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या एकूण ८ हजार ८३५ घटना घडल्या आहेत. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून १४४ जण जखमी झाले आहेत. २०२१ ते २०२५च्या तुलनेत २०२६ या वर्षात झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटना अधिक आहेत. गेल्या सात महिन्यांतच झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या तब्बल २ हजार २९८ घटना घडल्या आहेत. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर ३२ जण जखमी झाले आहेत.
Bhavesh Kaware: मी नॉन व्हेजबाबत तशी जाहिरात टाकली कारण मालक वारकरी; तरुणाचा खुलासा, पण मनसेचा आक्रमक इशारा!पाऊस नसतानाही दुर्घटनासत्र
मुंबईत पावसाळापूर्व कामांमध्ये मुंबई महापालिकेकडून झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम केले जाते. तसेच, धोकादायक झाडे किंवा फांद्यांचा धोका असल्यास त्याची माहिती महापालिकेला देण्याच्या सूचना रहिवासी भागांत केल्या जातात. मात्र पावसाळ्याशिवाय इतर काळातही, तसेच पावसाळ्यात झाडांचा धोका वाढला असून तो कायम असल्याचे चेंबूरमधील दुर्घटनेनंतर समोर आले आहे.

